Skip to main content

सेवापुर्ति निमित्त महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात कार्यक्रम संपन्न

  


किनवट,दि.३: मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी(ता.किनवट व्दारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा( किनवट) येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सेवापुर्ती सोहळा महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी(दि.१) रात्री आठ वाजता मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकुल, कोठारी( ता.किनवट) येथे उत्साहात साजरा झाला.

 कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम हे होते. प्रमुख पाहुणे आनंदराव वाढे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी,नांदेड, अनिल महामुने, अधिक्षक, शालेय पोषण आहार,किनवट, सौ.शुभांगीताई ठमके, प्राचार्या म.ज्यो.फुले क.म.वि.घोटी,म.ज्यो.फुले.मा.व.उमावि.गोकुंदा, किनवट संस्थेचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोकुंदा, किनवट चे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके,आनंद मच्छेवार,माजी नगराध्यक्ष,किनवट आदी विचारमंचावर उपस्थित होते.



     सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अतिथी देवो भव्य ! या भारतीय संस्कृतीला जपत आलेल्या मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए.पी.जुनगरे यांनी या सेवापुर्ती सोहळ्याच्या आयोजना मागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली.

या सेवापुर्ती सोहळ्यात तब्बल १२ कर्मचाऱ्यांना सहकुटुंब शाल, पुष्पगुच्छ आणि वस्त्ररूपी भेट देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये पूर्व मुख्याध्यापक एच.ए.शेख, उपप्राचार्य एस.के.राऊत, उपमुख्याध्यापक जे.एस.पठाण, पर्यवेक्षक,एस.डी.वाठोरे,

पर्यवेक्षक श्री.व्ही.ए.चव्हाण, श्रीमती एम.एस.सर्पे, वरिष्ठ लिपिक श्री.ए.एम.सर्पे,श्री.आर.एच. येरेकार,श्री.एस.जी.तम्मेवार, श्री.पी.जी.घुले ,श्री.जी.डी.दामोधर, सेवक एन.एस.देवतळे यांचा समावेश होता. 

  या सेवापुर्ती सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करतांना आंनदराव ठमके व मातोश्री कमलताई ठमके यांनी जे इवलसं रोपट लावलं होतं त्याचा वटवृक्ष होत असताना "यांची देही याची डोळा" पाहण्याचा योग अभियंता श्री. प्रशांत ठमके आणि सौ.शुभांगीताई ठमके या दाम्पत्यामुळे आला,असे भावपूर्ण उद्गार सत्कारमुर्तीनी काढले.

याप्रसंगी कृतज्ञ भावनेने प्रा.मायावती सर्पे यांनी संस्थेच्या विद्यार्थी सहाय्यता कक्षाच्या दोन विभागास  एकविस हजार रूपयांचे दोन धनादेश

मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए.पी.जुनगरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाधीन केले. 

अध्यक्षीय समारोप करताना आमदार भीमराव केराम यांनी  यांनी संस्थेचे सचिव अभि.श्री.प्रशांत ठमके व  कोषाध्यक्षा सौ.शुभांगीताई ठमके यांनी किनवट सारख्या आदिवासी बहुल भागात जो शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे त्या बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेच्या वतीने जो सेवापुर्ती आनंद सोहळा आयोजित करण्यात आला तो खऱ्या अर्थाने पारिवारिक सोहळा भासला, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य आर.ए.जाधव, उपमुख्याध्यापक पी.जी.मुनेशवर, पर्यवेक्षक किशोर डांगे सर, पर्यवेक्षक सूर्यवंशी सर,बंडु भाटशंकर सर,प्रशांत डवरे सर,आदींनी परिश्रम घेतले.या सेवापुर्ती समारंभास मोठ्या संख्येने पत्रकार बांधव, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक, मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते सदर कार्यक्रमा सूत्रसंचलन पर्यवेक्षक प्रा.एस.ए.बैसठाकुर यांनी केले तर आभार प्रज्ञा मॅडम यांनी मानले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...