Skip to main content

पोलिसांचे समर्पण

 

     

                  ....इंग्रजांच्या काळात जसे लोक पोलिसांना घाबरायचे तसे आता जनतेने घाबरावे अशी कुणीही अपेक्षा करणार नाही. अलीकडे पोलिसांवर हल्ले वाढत असल्याचे दिसून येत आहे ,ही खरंच चिंतेची गोष्ट आहे. पण जशी जशी शिक्षण व्यवस्था प्रगत होत गेली, तशी लोकांची विचार करण्याची प्रगती पण झाली. त्यामुळे आज बर्‍याच लोकांना असे वाटते, की पोलीस आपल्या बळाचा योग्य वापर करतात पण तुम्हाला पोलिसांचे जनतेप्रती समर्पण कधीच दिसत नाही .पोलीस जनतेसाठी किती झटतात हे आम्हाला कधीच दिसले नाही का?

                पोलीस पैसे खातात असे बरेच लोक म्हणतात तुम्ही किती पैसे देता पोलिसांना तुमचे काम केल्यावर ?किती वेळा पैसे घेतल्याशिवाय पोलीसांनी  तुमचे काम केले नाही. का पैसे घेतल्याशिवाय पोलीस तुमचं काम करत नाहीत. असे किती व्हिडिओ आहेत, की ज्यामध्ये तुम्ही जर बाईक चालवत असाल तर तुम्हाला हेल्मेट घातले नसेल तर पोलिसांनी तुम्हाला हेल्मेट आणून दिले, आणि तुमचे प्राण वाचवले.

                               चोरी झाली पोलिसांना बोलवा, मंत्री आले पोलिसांना बोलवा, दरोडा पडला पोलिसांना बोलवा, गर्दी झाली पोलिसांना बोलवा, दहा रुपये वीस वीस रुपये साठी जनतेमध्ये खून होतात तेव्हा पोलिसच तुमच्या मदतीला येतो ना तुम्ही तर समजुतदारपणाने भांडणे मिटवून घेणार नाही.  तुम्ही जर गुन्हा केला तर तो लगेच मान्य करा पोलिसांनी वचक देईपर्यंत वाट कशाला पाहायची पोलीस जे तुम्हाला विचारतात ते तुम्ही जर खरं सांगितलं त्यांना सहाय्य दिलं तर ते तुमची मदत करतील.

                          तुम्ही बारा महिन्यातला प्रत्येक सण कसा साजरा करतात आणि पोलिस मात्र आपली ड्युटी करतो  तर कोणी सणावर काही भांडणे करू नाही अजून कोणतं समर्पण द्यावे पोलिसांनी ....  पोलीस पण एक माणूसच आहे त्याला पण कुटुंब आहे त्याला पण वाटते की आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करावा पण तो आपलं कर्तव्य  असतो. प्रत्येक पोलिसाला आपल्या कुटुंबाची ओढ असते. तो पण माणूसच आहे वर्दी घातली म्हणजे तू काय सर्व तुमच्या जबाबदाऱ्या झेलायला नाही. 

                               त्यांच्या घरी त्यांना लहान मुले असतात ते  त्यांची वाट पहात असतात ,आपले वडील कधी घरी येतात, तरी पण घरी जायच्या वेळेवर जर एखादे काम आले ,तर ते असं म्हणत नाहीत की माझी नोकरी संपली ,का मी आज जास्त काम केले, का  माझी जायची वेळ झाली ,ते आलेले आपले काम हातात घेऊन पूर्ण करतात ,घरदार- कुटुंब नंतर अगोदर काम असे ते म्हणतात.

                                 26/ 11 च्या घटनेमध्ये मध्ये पोलिसांचे किती मोठे समर्पण आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी आपल्या देशातल्या तसेच परदेशातल्याही लोकांचे प्राण वाचवले आणि काही पोलिसांनी तर आपल्या प्राणांची पण आहुती दिली आहे. बॉम्ब ब्लास्ट झाला तरी पोलीस आपले कर्तव्य निभावतात, पाऊस पडतो तेंव्हा पावसात उभे राहून कर्तव्य पार पाडतात.पावसामध्ये झाडे तुटणे, विजेचा वायर तुटणे,वीज पडणे असे अनेक घटना घडतात तरी ते आपले कर्तव्य पार पाडतात. अजून कोणते समर्पण द्यावे पोलीसांनी?

                         उन्हाळ्यात उन्हामध्ये, हिवाळ्यात थंडीत, पावसाळ्यात पाण्यात उभे राहून जनतेची सेवा आपल्या कर्तव्यापोटी करतात. निवडणुकीच्या काळात तर पोलिसांची खूपच जास्त प्रमाणात  परेशणि होते. गणपती असो देवी असो  यांच्या विसर्जनाच्या दिवशी तर त्यांना दोन-दोन दिवस पोलीस स्टेशनमध्ये थांबावे लागते. 

          माझ्या मुलाचा विवानच वाढदिवस होता तर  माझे मिस्टर प्रसाद वागरे (API मुंबई)  वाढदिवसाला येऊ शकले नाही ,माझ्या  विवानने पप्पांची खूप वाट बघितली पण ते येऊ शकले नाही कारण तो पिरेड करोनाचा होता त्यामुळे त्यांना सुट्टी  दिली नाही.ते आपले कर्तव्य बजावत होते. तुम्ही जनता पोलिसांना खूप नावे ठेवता पण प्रत्येक पोलीस आपल्या जीवनातल्या आशा कित्येक सुखाचे समर्पण देतो,ते  तुम्हाला समजणार नाही.

                        तुम्ही थोडं त्यांच्या जागी जाऊन नोकरी करा ,तेव्हा तुम्हाला समजेल. पोलिसांना म्हणावा इतका पगार नाही ,तरी ते कधी आपले दुखडी बाजू मांडत नाहीत . आपल्याला कोणती पण मदत  पोलीस करतात. पोलीस हा प्रत्येक  कर्तव्यासाठी समर्पण करत असतो. मग आपण पण त्यांना सहाय्य देऊन त्यांच्या कामात मदत केली पाहिजे. जनतेने  प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्यापुढे समर्पण करावे. 

  

                                धनश्री सुगावकर- वागरे

                                         नांदेड - मुंबई

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला