Skip to main content

10 केंद्रावर 123 सीसीटीव्हीच्या नियंत्रणात 3525 विद्यार्थी देणार 12 वीची परीक्षा # कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यास प्रशासन सज्ज


किनवट : मंगळवारी (ता.10) इयत्ता 12 वीच्या परिक्षेस प्रारंभ होणार असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी केली असून तालुक्यातील 10 केंद्रावर तीन हजार पाचशे पंचेवीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

     सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांच्या अध्यक्षतेखाली उप विभागातील किनवट व माहूर तालुक्यातील केंद्र संचालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर (किनवट) , अभिजीत जगताप (माहूर) , पंचायत समिती , उप विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे , माहूरचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस , गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने (किनवट) , संतोष शेटकार (माहूर) , विस्तार अधिकारी ( पं) वसंत वाघमारे, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , सहायक परिरक्षक शेषराव पाटील (माहूर) व समशीर खान (किनवट) यांची प्रमुख उपस्थिती होती.

     जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष राहूल कर्डिले , मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली , जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (मा) तथा  जिल्हा दक्षता समिती सदस्य सचिव माधव सलगर यांच्या नेतृत्वात यावर्षी कापीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी उचित तयारी केली आहे.

     सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला, किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर व पंचायत समिती किनवटच्या गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार , विस्तार अधिकारी यांचे भरारी पथक जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केले आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर पंचायत , शिक्षण , महसूल , कृषि व बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांचे बैठे पथक परीक्षा संपेपर्यंत ठाण मांडून राहणार आहे. किनवट तालुक्यात 10 परीक्षा केंद्र असून 3502 विद्यार्थी परिक्षेस बसले आहेत. 142 वर्गखोल्यात 3510 ड्यूल डेस्क चीव्यवस्था केली असून प्रत्येक वर्गखोलीवर  123 सीसीटीव्ही  कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. अशी माहिती गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक अनिलकुमार महामुने यांनी दिली.

     उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनस्त सर्व ठाणेदारांनी चोख पोलीस बंदोबस्त आखला आहे.

    

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.