Skip to main content

किनवट मध्ये प्रभाग २ मध्ये लक्षवेधी लढत

 


किनवट ता. प्र.


नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 2 ‘ब’ म्हणजे साठेनगरमधील पाचही उमेदवारांची अधिकृत यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे. या यादी आणि चिन्हवाटपानंतर प्रभागातील निवडणुकीचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले असून स्थानिक सामाजिक रचनेमुळे ही लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे.


प्रभाग 2 ‘ब’ मध्ये यंदा एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. अधिकृतपणे मिळालेली चिन्हे पुढीलप्रमाणे—


नरेश पोशराव माहूरकर (अपक्ष) — नारळ 


खान अरबाज अहमद खान — पतंग


खान मोहम्मद अली काहेर — गॅस सिलेंडर


पठाण मोहम्मद हसन नूर खान — तुतारी वाजवणारा माणूस


बडगुजर माजोद्दीन शकीलोद्दीन — कमळ 





या प्रभागाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे एकूण पाचपैकी चार मुस्लिम उमेदवार, तर एकमेव गैर-मुस्लिम चेहरा म्हणून अपक्ष नरेश माहूरकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे साठेनगर प्रभागात सामाजिक आणि मतदारसंघातील विविधता या निवडणुकीला वेगळे परिमाण देत आहे.


माज बडगुजर हे भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याने त्यांना पक्ष संघटनाचा फायदा होईल व मुस्लिम मतदारांची संख्या ह्या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.


पठाण मोहम्मद हसन नूर खान —हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून अधीकृत उमेदवार आहेत, पक्ष संघटना व कार्यकर्ते हे त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतंय. 


तर नरेश माहूरकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. स्थानिक स्तरावर नरेश माहूरकर हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असल्याने त्या कामाचा उल्लेख नागरिकांमध्ये वारंवार केला जातो. साठेनगर भागातील युवकांशी त्यांचा नियमित संवाद आणि त्यांचे स्थानिक वास्तव्य यामुळे स्थानिक स्तरावर ओळखले जाणारे आणि चर्चेतले नाव बनले आहेत.

तथापि, निवडणूक वातावरणात सर्व पाचही उमेदवारांचे आपल्या पद्धतीने जनसंपर्क सुरू असून प्रभागातील प्रत्येक भागात प्रचाराची चुरस वाढत आहे.




चिन्हांचे वाटप झाल्याने आता सर्व उमेदवारांना मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी काहीच दिवस उपलब्ध आहेत. साठेनगरमध्ये यंदाची लढत स्पर्धात्मक होणार हे निश्चित झाले असून मतदार या पाच उमेदवारांपैकी कोणाला कौल देतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...