Skip to main content

परिवर्तन गायन कला मंचची किनवट विश्रामगृह येथे बैठक, किशनराव ठमके यांची अध्यक्षपदी निवड


(किनवट ता. प्र.) 

ता. 0४- रोजी विश्रामग्रह परिसर किनवट येथे तालुक्यातील  गायक कवि संगीतवादक कलावंताची बैठक पार पडली . या बैठकीमध्ये सर्वानुमते  असे ठरले कि  किनवट माहुर परिसरातील ग्रामीण भागात चांगल्या प्रकारचे उत्कृष्ठ गायक वादक कवि गितकार कलावंत आहेत परंतु त्यांना प्रसिद्धी नाही व ते दुर्लक्षीत आहेत त्यासाठी नाव प्रतिनिधी श्री आत्मानंद सत्यवंश यांनी परिर्वतन गायक कला मंच स्थापन करण्याचा उपस्थित कलाकारासमोर  इच्छा व्यक्त केली . 

तसेच हा ग्रुप व्हाटसप तयार करण्याचे ठरवले व कलाकारांनी या ग्रुपवर गायन वादन महापुरुषावरील गिते भजन गवळन संगीत टाकून प्रसिद्ध व्हावे असे ठरले 

यावेळी ग्रुपचे संस्थापक श्री आत्मानंद सत्यवंश यांनी सुचविल्याप्रमाणे परिर्वतन गायन कला मंच किनवट चे अध्यक्ष म्हणून जेष्ठ गायक श्री किशनराव ठमके यांची निवड सर्वानुमते करण्यांत आली 

मार्गदर्शक कलावंत :-

श्री सुरेश शेंडे (कवि) साडी माडी फेम

श्री बालाजी वाढवे  जेष्ठ गायक

श्री रामस्वरूप मडावी ( कवि - काहुर फेम )

श्री विवेकजी ओंकार ( इन्स्टा रिल स्टार ),

श्री महेंद्र नरवाडे (कवि - सांगावा फेम ),श्री विजय वाघमारे गायक,

श्री रहेमत अली गीतकार

श्री शाहीर मुनेश्वर

श्री साहेबराव वाढवे ढोलकी सम्राट

श्री राजेश पाटील (कवि गायक, पत्रकार इन्स्टा रिलस्टार )

आदीची उपस्थिती होती

श्री सुरेश शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते