Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी



किनवट,दि.१४ : महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज(दि .१४)शहरासह गोकुंद्यात विविध ठिकाणी  उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास संपन्न झाला.

     प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्याहस्ते पंचशिल ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी  अनिल उमरे यांनी ध्वज गीत घेतले.नंतर उपस्थित  भिक्खुनी सामुहिक वंदना घेतली. उपस्थित मान्यवरांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याठीकाणी ॲड.सुनिल येरेकार व अंकुश भालेराव यांच्या हस्ते खिचडीचे वाटप करण्यात आले.     

तसेच एस टी महामंडळाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शालेय मुलींनी भीम गितावर लेझीम नृत्य सादर केले व महामंडळा तर्फे भोजनदान देण्यात आले.

सिद्धार्थनगरातील जेतवन बुद्ध विहारात सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले .त्रिसरण, पंचशिल व सामुहिक वंदना अनिल उमरेड यांनी  घेतली.नंतर भोजनदान देण्यात  आले. सायंकाळी पाच वाजता महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली.

तसेच रमामाता चौक जवळ अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

 शिव - शाहू - फुले - आंबेडकर - अण्णाभाऊ विचारमंचा द्वारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी सहा वाजता साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात श्रीकांत देशमुख, सुप्रसिध्द कवी व कथाकार यांचे व्याख्यान होणार आहे.जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमास विविध पक्ष,संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, डॉक्टर,वकील, लोकप्रतिनिधी यांच्यासह समाजातील सर्व  स्तरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,यात महीला व बालकांचा सहभाग लक्षणीय होता. जयंतीच्या पूर्वदिवशी ता.१३ रोजी रात्री १२ वाजता डॉ . आंबेडकर पुतळ्याजवळ व  रमामाता चौकात फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी बाजी करण्यात आली. यावेळी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे,किनवट वकील संघाचे कोषाध्यक्ष ॲड.सम्राट सर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.