Skip to main content

क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची198 वी जयंती उत्साहात

 (क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची198 वी  जयंती उत्साहात अभिवादन करतांना मान्यवर)


राजेश पाटील/किनवट तालुका बातमीदार  : महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आज (दि.११) उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा बसस्थानकाजवळील महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी ११वाजता संपन्न झाला.यानिमित्त झालेल्या प्रबोधन सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम हे होते.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मार्क्स -फुले-आंबेडकर('माफुआ'), चळवळीचे जेष्ठ  विचारवंत प्रा.रामप्रसाद तौर यांनी विचार व्यक्त केलेत.



प्रास्ताविक फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी केले.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.

मंचावर माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, आनंदराव वाढे,आनंद मच्छेवार,राम भरणे, किनवट न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड.किशोर मुनेश्वर, ॲड.जय खराटे , दादाराव कयापाक , प्रशांत ठमके , प्राचार्या शुभांगीताई ठमके, श्रीनिवास  नेम्मानिवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


     प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांनी महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, शेषेराव पेटकुले, प्रा.लक्ष्मन पेटकुले, अनिल महामुने, प्रा.दगडु भरकड, अभय महाजन, प्रा.उमाकांत इंगोले, प्रा.शिवदास बोकडे,गिरीष नेम्मानिवार, रमेश बद्दीवार, अजय कदम, उमाकांत क-हाळे, जीवन कोटरंगे , एस.के.राऊत,  प्रमोद पोहरकर, संजय सिडाम ,ज्योतिबा गोनारकर ॲड.मिलिंद सर्पे, राजेश पाटील, प्रफुल आढागळे, संजय नरवाडे,ॲड.हरीभाऊ दर्शनवाड, माधव कावळे ,फसिउल्ला, नरेंद्र दोराटे, दिगांबर पंडीत, अभय नगराळे , रविकांत सर्पे, बबन वानखेडे, अशोक वासाटे, मारोती सुंकलवाड, उध्दव रामतिर्थकर, दत्ता दोनकेवार, गंगुबाई परेकार, निखिल  कावळे, आकाश सर्पे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...