Skip to main content

किनवट डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. नागरगोजे, सचिवपदी डॉ. सूर्यवंशी यांची निवड

 



किनवट/प्रतिनिधीः किनवट डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर बालाजी नागरगोजे यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदी डॉक्टर रितेश सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी डॉक्टर वसंत बामणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

किनवट डॉक्टर असोसिएशनची बैठक मावळते अध्यक्ष डॉक्टर गिरीश पत्की यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत डॉक्टरांच्या विविध अडचणीवर विचार विनिमय करण्यात आले आणि पुढील वर्षाची कामाची दिशाही ठरविण्यात आली.

पुढील पाच वर्षाची कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी डॉक्टर अविनाश पवार, सहसचिव डॉक्टर अरविंद भुरके, सहसचिव डॉक्टर राहील शेख, सदस्य डॉक्टर वैजनाथ साठे, डॉक्टर शिवशंकर केंद्रे, डॉक्टर संजय लोमटे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीला डॉक्टर सतीश कांबळे, डॉक्टर उपासनी, डॉक्टर गडसिंग, डॉक्टर सुरेंद्र जनवार डॉक्टर अमोल सिन्नर डॉक्टर गावंडे, डॉक्टर अभिजीत ओव्हाळ यांच्यासह शहरातील मान्यवर डॉक्टरांनी ची उपस्थिती होती. बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...