Skip to main content

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे : संजीव वानखेडे

 


किनवट : शासनाच्या विविध व जनकल्याणकारी योजना राबविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायत कर्मचारी आज दारिद्रय नारायणाचा अवतार म्हणून जगत आहेत. ग्रामपंचायत कामगार आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढत असून, किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांनी 1 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरुन निघणार्‍या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजीव अंबादास वानखेडे यांनी केले आहे.

मुंबईच्या आझाद मैदानावरून विधानसभेवर मोर्चा धडक देणार आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन लागू करणे, कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटना (ई.पी. एफ.) या कार्यालयात जमा करणे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वर्ग 3 व 4 च्या पदावर नियुक्ती द्यावी, यासह विविध मागण्या रेटून धरल्या जाणार आहे. सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस दयानंद एरंडे व कार्याध्यक्ष जनार्दन मुळे यांनी या आंदोलनाची हाक दिली असून या मोर्चाचे नेतृत्व आ. सचिन अहिर करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष संजीव अंबादास वानखेडे, उपाध्यक्ष अनिल कोत्तावार, सचिव अरविंद घुगे, कार्याध्यक्ष विठ्ठल कागणे, संघटक भीमराव कानिंदे, सहसचिव कैलास शिरपुरे, मारोती येरावार, गणेश गायकवाड, रतन नोळे, ताराचंद जाधव, लक्ष्मीबाई दर्शनवाड, जयवंत टारपे, भास्कर सूर्यवंशी, भिकू पवार, लक्ष्मण मडावी, रामदास तलांडे, तथागत वावळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...