Skip to main content

किनवट राष्ट्रीय राज्यमहामार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू

 


किनवट/प्रतिनीधी:-

किनवट शहरातून रस्ता रुंदी करण्याच्या नावावर मागील पाच वर्षापासून शहरांमधील चुंगी नाका ते डॉ. आंबेडकर चौक रस्त्याची दयनिय अवस्था असल्यामुळे या रस्त्यावर वाहन चालकांना व व्यापाऱ्यांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु तात्काळ सदरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा किनवट तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की भोकरपाटा ते धनोड्यापर्यंत 161 राष्ट्रीय माहामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाले परंतु काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या रस्त्यावर अनेक अपघातही घडले तर शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या नावावर या रस्त्याकडे शासनाचे व लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. शिवाय पाच वर्षापासून शहर विशीयांना या रस्त्या व वरुन चालतांना जिव मुठीत धरुन चालावे लागत आहे हीवाळा उन्हाळा धुळच धुळ तर पावसाळ्यात चिखल पाण्याचा जीव घेणा ञास रस्त्याची कोणतेही डागडूगी नसल्यामुळे संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला आहे. अरुंद रस्ता त्यातल्या त्यात न्यायाची देवता मानली जाणारी न्यायालय यासमोरही संपूर्ण खड्डे व धुळीचे साम्राज्य जमले आहे जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवणे ही कठीण होत आहे. अनेकदा छोटे मोठे अपघातही घडले परंतु सदरील रस्त्याकडे वारंवार निवेदने व मागण्या करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे

आशोक स्थंभ ते डॉ. आंबेडकर चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून याच रस्त्यालगत न्यायदेवतेचे

न्यायालय आहे परंतु रस्ता रुंदी करण्याच्या नावावर सदरील रस्त्याची दुरावस्था ही पाच वर्षापासून चालू असून संपूर्ण रस्त्याने खड्डे झाले . सदरील रस्ताचे रुंदीकरण होईल तेव्हा होईल परंतु आज स्थितीला रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या प्रकारचे निवेदने व मागण्या वारंवार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे पत्रकार संघटनेने सदरील रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी तात्काळ रस्ता डांबरीकरण करण्यात यावा ही मागणी शासनाकडे केली असून जनहीताच्या मागणी कडे जर आठ दिवसांमध्ये पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने रस्त्याच्या दुरुस्तकरीता सर्व पक्षीयासह आमजनतेला सोबत घेउन तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...