किनवट/प्रतिनीधी:-
किनवट शहरातून रस्ता रुंदी करण्याच्या नावावर मागील पाच वर्षापासून शहरांमधील चुंगी नाका ते डॉ. आंबेडकर चौक रस्त्याची दयनिय अवस्था असल्यामुळे या रस्त्यावर वाहन चालकांना व व्यापाऱ्यांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु तात्काळ सदरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा किनवट तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की भोकरपाटा ते धनोड्यापर्यंत 161 राष्ट्रीय माहामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाले परंतु काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या रस्त्यावर अनेक अपघातही घडले तर शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या नावावर या रस्त्याकडे शासनाचे व लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. शिवाय पाच वर्षापासून शहर विशीयांना या रस्त्या व वरुन चालतांना जिव मुठीत धरुन चालावे लागत आहे हीवाळा उन्हाळा धुळच धुळ तर पावसाळ्यात चिखल पाण्याचा जीव घेणा ञास रस्त्याची कोणतेही डागडूगी नसल्यामुळे संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला आहे. अरुंद रस्ता त्यातल्या त्यात न्यायाची देवता मानली जाणारी न्यायालय यासमोरही संपूर्ण खड्डे व धुळीचे साम्राज्य जमले आहे जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवणे ही कठीण होत आहे. अनेकदा छोटे मोठे अपघातही घडले परंतु सदरील रस्त्याकडे वारंवार निवेदने व मागण्या करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे
आशोक स्थंभ ते डॉ. आंबेडकर चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून याच रस्त्यालगत न्यायदेवतेचे
न्यायालय आहे परंतु रस्ता रुंदी करण्याच्या नावावर सदरील रस्त्याची दुरावस्था ही पाच वर्षापासून चालू असून संपूर्ण रस्त्याने खड्डे झाले . सदरील रस्ताचे रुंदीकरण होईल तेव्हा होईल परंतु आज स्थितीला रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या प्रकारचे निवेदने व मागण्या वारंवार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे पत्रकार संघटनेने सदरील रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी तात्काळ रस्ता डांबरीकरण करण्यात यावा ही मागणी शासनाकडे केली असून जनहीताच्या मागणी कडे जर आठ दिवसांमध्ये पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने रस्त्याच्या दुरुस्तकरीता सर्व पक्षीयासह आमजनतेला सोबत घेउन तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment