Skip to main content

किनवट राष्ट्रीय राज्यमहामार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू

 


किनवट/प्रतिनीधी:-

किनवट शहरातून रस्ता रुंदी करण्याच्या नावावर मागील पाच वर्षापासून शहरांमधील चुंगी नाका ते डॉ. आंबेडकर चौक रस्त्याची दयनिय अवस्था असल्यामुळे या रस्त्यावर वाहन चालकांना व व्यापाऱ्यांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु तात्काळ सदरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा किनवट तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की भोकरपाटा ते धनोड्यापर्यंत 161 राष्ट्रीय माहामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाले परंतु काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या रस्त्यावर अनेक अपघातही घडले तर शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या नावावर या रस्त्याकडे शासनाचे व लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. शिवाय पाच वर्षापासून शहर विशीयांना या रस्त्या व वरुन चालतांना जिव मुठीत धरुन चालावे लागत आहे हीवाळा उन्हाळा धुळच धुळ तर पावसाळ्यात चिखल पाण्याचा जीव घेणा ञास रस्त्याची कोणतेही डागडूगी नसल्यामुळे संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला आहे. अरुंद रस्ता त्यातल्या त्यात न्यायाची देवता मानली जाणारी न्यायालय यासमोरही संपूर्ण खड्डे व धुळीचे साम्राज्य जमले आहे जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवणे ही कठीण होत आहे. अनेकदा छोटे मोठे अपघातही घडले परंतु सदरील रस्त्याकडे वारंवार निवेदने व मागण्या करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे

आशोक स्थंभ ते डॉ. आंबेडकर चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून याच रस्त्यालगत न्यायदेवतेचे

न्यायालय आहे परंतु रस्ता रुंदी करण्याच्या नावावर सदरील रस्त्याची दुरावस्था ही पाच वर्षापासून चालू असून संपूर्ण रस्त्याने खड्डे झाले . सदरील रस्ताचे रुंदीकरण होईल तेव्हा होईल परंतु आज स्थितीला रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या प्रकारचे निवेदने व मागण्या वारंवार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे पत्रकार संघटनेने सदरील रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी तात्काळ रस्ता डांबरीकरण करण्यात यावा ही मागणी शासनाकडे केली असून जनहीताच्या मागणी कडे जर आठ दिवसांमध्ये पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने रस्त्याच्या दुरुस्तकरीता सर्व पक्षीयासह आमजनतेला सोबत घेउन तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...