Skip to main content

बळीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश!

 


किनवट, येथील बळीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.बारावी वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे.बारावी विज्ञान शाखेचा ९८ टक्के तर कला शाखेचा ७० टक्के   निकाल लागलेला आहे. विज्ञान शाखेतील सिरमनवार तनुश्री नरेंद्र   या विद्यार्थीनिने ८७.३३ ,बारापात्रे प्रियंका राजू  ८३.६७ ,बंडे शिवम जयराम ८१ टक्के  तर बारावी कला शाखेतून तरटे मोहन प्रकाश ६४ टक्के, आडे सोना बंडू  ६३.६७ टक्के, गिनगुले मनिषा मधुकर ६२.१७ टक्के, वाणिज्य शाखेतून  जाधव चंद्रशेखर विश्वनाथ ९०.६७, पवार तन्मय मदन ८८.०० टक्के, दराडे रुद्राक्ष माधव  ८१.३३ टक्के  घेऊन महाविद्यालयातून प्रथम,व्दित्तीय ,तृत्तीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.  यासह २० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर एकुण ७४ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाने गुणवंता सिद्ध करुन शैक्षणिक क्षेत्रातील या गंगणझेपीमुळे किनवट परिसरातील नामांकित महाविद्यालयाने आपले नांव लौकिक केले आहे.बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे किनवट शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर,उपप्राचार्य  डॉ. पंजाब शेरे, पर्यवेक्षक  प्रा. अनिल पाटील,वाणिज्य विभागाचे  प्रा. काझी  एस. एस. , कार्यालयीन अधिक्षक यमुना कुमरे  यांच्यासह सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...