Skip to main content

किनवटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजुर



किनवट ता. प्र.:-

किनवट किनवट येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उभारणीसाठी मंजुरी मिळाली असून तसे पत्र २२ एप्रिल रोजी नांदेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुरेखा कोसमकर यांनी पाठविले आहे.

नांदेड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आणि शेजारच्या तालुक्यांसाठी स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालय निर्माण करावे, अशी येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. न्यायालयीन कामकाजासाठी नांदेड येथे येत असताना नागरिकांचा वेळ तसेच पैशाचा अपव्यय होत होता. किनवट हा आदिवासी तसेच डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय नाही. त्यामुळे येथे जिल्हा सत्र न्यायालय 

मंजूर करावे, अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. दरम्यान, २२ एप्रिल रोजी नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने किनवट येथील बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठविले असून त्यात किनवट येथे जिल्हा आणि अतिरिक्त सन्त्र न्यायालय उभारणीसाठी मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. किनवट आणि माहूर तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचेही या पत्रात सूचित केले आहे.

दरम्यान, किनवट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने या भागातील पक्षकार, वकिलांची अनेक दिवसांची मागणी

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते