Skip to main content

एकीकडे दुःख, दुसरीकडे दिलासा, हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द, पण पत्नीला लॉटरी, सूत्रांची माहिती




महाराष्ट्र:-

 शि वसेनेच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत आणि आज दिवसभर प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं.

हे बैठकांचं सत्र अद्यापही सुरुच आहे. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या. हेमंत पाटील यांची उमेदवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली. पण हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी विरोध दर्शवल्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली. त्यामुळे ते सुद्ध चिंतेत होते. अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं आहे. शिवसेना पक्षाने हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. असं असलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने त्यांना थोडासा दिलासादेखील दिला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली असली तरी त्यांना काहीसा दिलासा दिला आहे. शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याबाबतचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण या निर्णयाने भावना गवळी यांच्यासाठी मोठा राजकीय झटका बसणार आहे. भावना गवळी यांचं लोकसभेचं तिकीट कापलं जाईल अशी सातत्याने चर्चा होती. पण त्यांच्याऐवजी मंत्री संजय राठोड यांना तिकीट दिलं जाईल, अशी चर्चा होती. पण आता शिवसेनेकडून राजश्री पाटील

जाईल, अशी चर्चा होती. पण आता शिवसेनेकडून राजश्री पाटील यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा : शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदारी रद्द, नवा उमेदवार घोषित


वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटाबाबत अखेर अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे वाशिम-यवतमाळच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहिला. वाशिम-यवतमाळसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. याबाबत मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.


संजय राठोड काय म्हणाले?


"नामांकन दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. महायुतीच्यावतीने उद्या नामांकन पत्र दाखल करणार आहोत. या नामांकन पत्र दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः हजर राहणार आहेत. उमेदवाराबाबत आमचे वरिष्ठ नेता स्वतः त्यावेळेस घोषणा करतील", असं संजय राठोड म्हणाले


आहेत.


दरम्यान, संजय राठोड यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला देखील


प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका


मांडली. "आम्ही उद्या नक्कीच शेवटच्या दिवशी फॉर्म भरणार


आहोत. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर

आहोत. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होईल", अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. "राज्याचे आमचे वरिष्ठ तीनही नेते, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची इच्छा असेल तर कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन निश्चितच केलं जाईल", अशी सूचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते