Skip to main content

एकीकडे दुःख, दुसरीकडे दिलासा, हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द, पण पत्नीला लॉटरी, सूत्रांची माहिती




महाराष्ट्र:-

 शि वसेनेच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत आणि आज दिवसभर प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं.

हे बैठकांचं सत्र अद्यापही सुरुच आहे. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या. हेमंत पाटील यांची उमेदवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली. पण हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी विरोध दर्शवल्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली. त्यामुळे ते सुद्ध चिंतेत होते. अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं आहे. शिवसेना पक्षाने हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. असं असलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने त्यांना थोडासा दिलासादेखील दिला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली असली तरी त्यांना काहीसा दिलासा दिला आहे. शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याबाबतचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण या निर्णयाने भावना गवळी यांच्यासाठी मोठा राजकीय झटका बसणार आहे. भावना गवळी यांचं लोकसभेचं तिकीट कापलं जाईल अशी सातत्याने चर्चा होती. पण त्यांच्याऐवजी मंत्री संजय राठोड यांना तिकीट दिलं जाईल, अशी चर्चा होती. पण आता शिवसेनेकडून राजश्री पाटील

जाईल, अशी चर्चा होती. पण आता शिवसेनेकडून राजश्री पाटील यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा : शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदारी रद्द, नवा उमेदवार घोषित


वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटाबाबत अखेर अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे वाशिम-यवतमाळच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहिला. वाशिम-यवतमाळसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. याबाबत मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.


संजय राठोड काय म्हणाले?


"नामांकन दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. महायुतीच्यावतीने उद्या नामांकन पत्र दाखल करणार आहोत. या नामांकन पत्र दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः हजर राहणार आहेत. उमेदवाराबाबत आमचे वरिष्ठ नेता स्वतः त्यावेळेस घोषणा करतील", असं संजय राठोड म्हणाले


आहेत.


दरम्यान, संजय राठोड यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला देखील


प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका


मांडली. "आम्ही उद्या नक्कीच शेवटच्या दिवशी फॉर्म भरणार


आहोत. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर

आहोत. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होईल", अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. "राज्याचे आमचे वरिष्ठ तीनही नेते, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची इच्छा असेल तर कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन निश्चितच केलं जाईल", अशी सूचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला