किनवट: भारतीय बौद्ध महासभा शाखा अंबाडी ता.किनवट च्या वतीने दि.१२ मार्च रोजी महान संत चिमणाजी महाराज यांची ८७ वि पुण्यथिती तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त बौद्ध उपासक,उपसिकांनी व आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या जाहीर पत्रकातून केले आहे
दरवर्षी ठिकाणी अंबाडी ता.किनवट येथे कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते हमखास मराठवाडा,विदर्भ व तेलंगणा राज्यातून बौद्ध उपासक व चिमणाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
पहिल्या सत्रात सकाळी ठीक साडे नऊ वाजता सतिष गिरीधर पाटील यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण होईल दुसऱ्या सत्रात दुपारी चार ते सात यावेळेत भोजनदान होईल तिसऱ्या सत्रात सायंकाळी पाच ते सात या वेळेत पूज्य भदंत कीर्ती आंनदबोधि,नालंदा बुद्धविहार तळेगाव जिल्हा रायगड यांचे धम्मदेशना होईल. चौथ्या सत्रात सायंकाळी आठ ते दहा या वेळेत अविनाश भारती (युवा व्याख्याते पुणे ) यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन होईल. पाचव्या सत्रात रात्री दहा वाजेपासून महाराष्ट्रचे ख्यातनाम कव्वाल संविधान मनोहरे (अमरावती) व प्रसिद्ध कव्वाला अंजली भारती(नागपूर) यांचा दणदणीत बुद्ध-भीम गीतांचा मुकाबला होईल.असे दिवसभर भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
कार्यक्रमाचा समारोप रविवारी १३ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभि.प्रशांत ठमके,सतिष गिरीधर पाटील शाखाध्यक्ष,उपाध्यक्ष विनोद पाटील, सचिव सुशील कानींदे, सुनील तेलंगे,महेश मुनेश्वर,विशुधानंद देठे,आनंद कानींदे ,अमित भवरे व सम्राट मुनेश्वर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा शाखा, रमाई महिला संघ व नवयुवक मिञ मंडळ शाखा अंबाडीच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे..
Comments
Post a Comment