Skip to main content

दर्जाहीन साड्या देऊन शासनाकडून महिलांची थट्टा: जनवादी महीला संघटनेचा आरोप

 




किनवट, ता.१५(बातमीदार): महाराष्ट्र सरकारच्या कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत दारिद्ररेषेखालील अंत्योदय योजनेत समावेश असणाऱ्या रेशन कार्ड धारकांना दर्जाहीन साड्यांचे वितरण सुरू आहे. असा आरोप अखिल भारतीय जनवादी महीला संघटनेच्या नेत्या शैलिया अर्जुन आडे यांनी केला.

  रेशनकार्डावर चांगल्या दर्जाच्या साड्या द्याव्यात तसेच फक्त अंत्योदय रेशनकार्ड धारकांनाच न देता सरसकट

साड्यांचे वितरण करण्यात यावे,अशी मागणीही त्यांनी केली. या साडीचा दर्जा अत्यंत सुमार असून पहिल्या दुसऱ्या धुण्यामध्ये या साड्यांचा पोचारा होईल असा आरोपही त्यांनी केला.


||आमदार, खासदारांना द्याव्या ||


काॅ.आडे म्हणाल्या की, राज्यातील आमदार खासदारांनी आणि त्यांच्या घरातील महिलांनी एक दिवस तरी हि साडी परिधान करावी. त्यातून त्यांना साडीचे पोत व दर्जा लक्षात येईल. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या

कॅप्टीव्ह मार्केट योजनेत वितरित होणाऱ्या साड्या यंत्र मागावर विणण्यात आल्याचे सांगण्यात येते. साडीची शासकीय किंमत महामंडळा तर्फे ई निविदे द्वारे केलेल्या करारानुसार सेवा शुल्का सह ३५५ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी अशी निर्धारित केली आहे. बाजारात या दर्जाची साडी प्रत्यक्षात १०० रुपयात मिळते. आगामी निवडणुकांच्या तोंडावर गाजावाजा करून वाटलेल्या या साड्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे त्यामुळे गरीब माता भगिनींची ही थट्टा आहे. असाही आरोपही शैलिया आडे यांनी केला.

-------------------------------------------------•

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते