Skip to main content

काँग्रेसच्या किनवट विधानसभा निरीक्षकपदी गिरीश नेम्मानीवार

 


( राजेश पाटील

,किनवट शहर प्रतिनिधी)

काँग्रेस प्रदेश कमिटीने किनवट माहूर विधानसभेच्या निरीक्षकपदी युवा, तडफदार नेते गिरीश यादवराव नेम्मानीवार यांची निवड केली आहे. किनवट मतदारसंघात काँग्रेस सरचिटणीसाचे पद प्रामाणिकपणे सांभाळीत पक्ष बळकट करण्याचे काम करणारे गिरीश नेम्मानीवार या तरूण कार्यकर्त्यांवर ही महत्वाची जबाबदारी सोपवल्यामुळे युवा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.


जिल्ह्यातील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हातात कमळ घेतल्यामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागेल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुनश्च उभारी देण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत


इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेने प्रदे- शाध्यक्ष नाना पटोले यांनी त्वरेने राज्यातील विधानसभेच्या २५२ मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसमधील जुन्या जाणत्या नेत्यांऐवजी तरुणाईस बळ दिल्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.


काँग्रेस पक्षात अनेक वर्ष निष्ठेने काम केल्यानंतर वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेत असतात. गेली अनेक वर्षे प्रामाणिकरित्या केलेल्या पक्षसेवेमुळेच प्रदेश काँग्रेस कमिटीने माझी निवड केली असावी. पक्षाने माझ्या प्रती दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून मला दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीन, अशी ग्वाही गिरीश नेम्मानीवार यांनी यावेळी दिली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...