Skip to main content

म.ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील तर सचिवपदी प्रशिक मुनेश्‍वर




किनवट: राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची ता.11 एप्रिल व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ता.14 एप्रिल रोजी संयुक्त जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरी होत असून या निमित्ताने जयंती समितीची कार्यकारीणी गठीत करण्यासाठी सिध्दार्थनगर येथील जेतवन बुध्दविहार येथे दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी सायं.7 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विचार विमर्ष केल्यानंतर सर्वानुमते जयंतीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील यांची तर सचिवपदी प्रशिक मुनेश्‍वर यांची निवड करण्यात आली. 

     निवड करण्यात आलेली कार्यकारीणी पुढील प्रमाणे ः- अध्यक्ष -गौतम पाटील, उपाध्यक्ष-निखिल दि.कावळे/योगेश भवरे, सचिव-प्रशिक मुनेश्‍वर, सहसचिव - आकाश सर्पे/ संघर्ष घुले, कोषाध्यक्ष -सूरज भरणे/आकाश आळणे, सहकोषाध्यक्ष -स्वप्नील सर्पे/ निवेदक कानिंदे, संयोजक- सुरेश कावळे. संघटक पदी शिलरत्न कावळे, सुगत नगराळे, सचिन कावळे, सुगत भरणे, रुपेश भवरे, राजू कावळे, प्रतिक नगराळे, पंकज नगारे व प्रसिध्दी प्रमुख म्हणून रवि कांबळे, राजेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

    बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.मिलिंद सर्पे हे होते. जयंती समितीसाठी मार्गदर्शक म्हणून दादाराव कयापाक, विनोद भरणे, माधव कावळे, रविकांत सर्पे, प्रकाश पाटील, अ‍ॅड.किशोर मुनेश्‍वर, सुरेश जाधव, शंकर नगराळे, चंद्रहार मुनेश्‍वर, विवेक ओंकार, मारोती मुनेश्‍वर, उध्दव भवरे, गंगाधर मुनेश्‍वर, मधुकर पाटील, ज्ञानेश्‍वर मुनेश्‍वर, किशन परेकार, नितीन कावळे, गौतम नगराळे, राजू भरणे, रमेश मुनेश्‍वर, उत्तम कानिंदे, अनात्मा कयापाक, राजू सर्पे, शिलरत्न पाटील हे राहणार आहेत.

     अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण या वर्षी जयंती निमित्त विशेष भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे जयंती मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौतम पाटील व सचिव प्रशिक मुनेश्‍वर यांनी सांगीतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...