Skip to main content

म.ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील तर सचिवपदी प्रशिक मुनेश्‍वर




किनवट: राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची ता.11 एप्रिल व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ता.14 एप्रिल रोजी संयुक्त जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरी होत असून या निमित्ताने जयंती समितीची कार्यकारीणी गठीत करण्यासाठी सिध्दार्थनगर येथील जेतवन बुध्दविहार येथे दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी सायं.7 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विचार विमर्ष केल्यानंतर सर्वानुमते जयंतीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील यांची तर सचिवपदी प्रशिक मुनेश्‍वर यांची निवड करण्यात आली. 

     निवड करण्यात आलेली कार्यकारीणी पुढील प्रमाणे ः- अध्यक्ष -गौतम पाटील, उपाध्यक्ष-निखिल दि.कावळे/योगेश भवरे, सचिव-प्रशिक मुनेश्‍वर, सहसचिव - आकाश सर्पे/ संघर्ष घुले, कोषाध्यक्ष -सूरज भरणे/आकाश आळणे, सहकोषाध्यक्ष -स्वप्नील सर्पे/ निवेदक कानिंदे, संयोजक- सुरेश कावळे. संघटक पदी शिलरत्न कावळे, सुगत नगराळे, सचिन कावळे, सुगत भरणे, रुपेश भवरे, राजू कावळे, प्रतिक नगराळे, पंकज नगारे व प्रसिध्दी प्रमुख म्हणून रवि कांबळे, राजेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

    बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.मिलिंद सर्पे हे होते. जयंती समितीसाठी मार्गदर्शक म्हणून दादाराव कयापाक, विनोद भरणे, माधव कावळे, रविकांत सर्पे, प्रकाश पाटील, अ‍ॅड.किशोर मुनेश्‍वर, सुरेश जाधव, शंकर नगराळे, चंद्रहार मुनेश्‍वर, विवेक ओंकार, मारोती मुनेश्‍वर, उध्दव भवरे, गंगाधर मुनेश्‍वर, मधुकर पाटील, ज्ञानेश्‍वर मुनेश्‍वर, किशन परेकार, नितीन कावळे, गौतम नगराळे, राजू भरणे, रमेश मुनेश्‍वर, उत्तम कानिंदे, अनात्मा कयापाक, राजू सर्पे, शिलरत्न पाटील हे राहणार आहेत.

     अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण या वर्षी जयंती निमित्त विशेष भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे जयंती मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौतम पाटील व सचिव प्रशिक मुनेश्‍वर यांनी सांगीतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला