Skip to main content

असा रंगला चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम !

 



किनवट ( प्रतिनिधी ) : कमठाला केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, भीमराव कुरसंगे, तंटामुक्त समितीचे गोपीनाथ पाटील, योगेश राघू, विजय पावडे, अनंता बादड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य बक्षीसे देण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदविधर शिक्षक अंकुश राऊत यांनी, प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी, तर आभार विद्या श्रीमेवार ह्यांनी केले. तंत्रस्नेही शिक्षक राहुल तामगाडगे यांनी  तांत्रीक बाबी सांभाळली तर एकनाथ बादड आणि ग्रामशिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, युवक मंडळांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 



           कार्यक्रमाच्या प्रारंभी शुभ दिन आयो रे..या गीताने झाला. त्यानंतर कु. मंत्रा गुंजकर हिचे मी 'जिजाऊ बोलतोय ' सम्रदा बादड हिचे 'मी सावित्री बोलतोय ' साईनाथ बादड याचे 'मी शिवाजी बोलतोय.. 'मारुती मेडलकर याचे 'मी आंबेडकर बोलतोय ' प्रतिक गुंजकर याचे 'मी राजे संभाजी बोलतोय.. ' अशा विविध एकपात्रीचे सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

           स्कूल चले हम, आमच्या पप्पांनी गणपती आणला, बम बम बोले..या गीतावर इयत्ता पहिली दुसरीचे विद्यार्थी मारुती, गणराज, आर्यन, आरव, आरोही, वैष्णवी, प्रीती, त्रिशा, अनन्या हिने सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर गुलाबी शरारा, लावणी रिमिक्सवर तनु, रुद्रा, मारुती, स्वरा, श्रेया, आरती, काजल, श्रध्दा हिने अप्रतिम नृत्य सादर केले. श्रेया, मंत्रा, पायल, लक्ष्मी, राधा, प्रतिमा हिने मायभूमी जन्मभूमी, आदिवासी नृत्य, कोळी रिमिक्स या गीतावर बहारदार नृत्य करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. माझी सखी बायको मेली आणि लिलिपुट या विनोदी गाण्यावर रोहन, प्रतीक, योगेश, ऋषिकेश, शिवम, निशांत, मारुती, ऋतिक, वीर, साईनाथ, अभिषेक, स्वराज यांनी नृत्य करून प्रेक्षकात हशा पिकविला.

         तनु बादड हिचा तेलगु डान्स, मंत्रा गुंजकर हिचा शिवकन्या, पायल वाघमारे हिचा भीमकन्या, रूपाली पवार हिचा देश रंगीला, स्वरा कदम हिचा नऊवारी साडी, वैष्णवी बादड हिचा केळेवाली, मारुती मेंडलकर याचे काठी न घोंगड आणि पूर्वी धुर्वे हिचे वाजले की बारा या लावणीने प्रेक्षकांनी वाहवा केली. अनेकांनी शैक्षणिक साहित्य बक्षीसं देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...