Skip to main content

मुलींना कुठलही समस्या उद्भवत असल्यास तत्काळ मदतीसाठी ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.- पो. नि. दीपक बोरसे

 



तालुका प्रतिनिधी किनवट

महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी तालुका किनवट येथे दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त " कायदा व सुव्यवस्था " या विषयासंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किनवट पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईल तंबाखू गुटखा या व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे आपल्या आई-वडिलांची मान शरमेने खाली झुकेल असे कोणतेही कृत्य करू नये. आपल्या प्रत्येक कृत्याचा आपल्या आई-वडिलांना गुरुजनांना अभिमान वाटला पाहिजे असे आचरण करावे. शाळा महाविद्यालयातील मुलींना शाळा - महाविद्यालयातील किंवा बाहेरच्या मुलांनी त्रास झाल्यास ११२ क्रमांकावर संपर्क करावा तत्काळ मदत मिळेल असे विचार त्यांनी त्या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शुभांगीताई ठमके होत्या.  कार्यक्रमास बोदमवाड साहेबांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात  राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दगडू भरकड यांनी केले तर आभार स्वाती गायकवाड मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक कीर्तीका भंडारे,  रूपाली पाटील मॅडम, प्राध्यापक संतोष चव्हाण, राजेश कदम, प्राध्यापक राजू पाटील, प्राध्यापक संतोष घुले, साहेबराव पाटील, प्रवीण पाटील यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला