Skip to main content

मुलींना कुठलही समस्या उद्भवत असल्यास तत्काळ मदतीसाठी ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.- पो. नि. दीपक बोरसे

 



तालुका प्रतिनिधी किनवट

महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी तालुका किनवट येथे दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त " कायदा व सुव्यवस्था " या विषयासंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किनवट पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईल तंबाखू गुटखा या व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे आपल्या आई-वडिलांची मान शरमेने खाली झुकेल असे कोणतेही कृत्य करू नये. आपल्या प्रत्येक कृत्याचा आपल्या आई-वडिलांना गुरुजनांना अभिमान वाटला पाहिजे असे आचरण करावे. शाळा महाविद्यालयातील मुलींना शाळा - महाविद्यालयातील किंवा बाहेरच्या मुलांनी त्रास झाल्यास ११२ क्रमांकावर संपर्क करावा तत्काळ मदत मिळेल असे विचार त्यांनी त्या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शुभांगीताई ठमके होत्या.  कार्यक्रमास बोदमवाड साहेबांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात  राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दगडू भरकड यांनी केले तर आभार स्वाती गायकवाड मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक कीर्तीका भंडारे,  रूपाली पाटील मॅडम, प्राध्यापक संतोष चव्हाण, राजेश कदम, प्राध्यापक राजू पाटील, प्राध्यापक संतोष घुले, साहेबराव पाटील, प्रवीण पाटील यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...