Skip to main content

मुलींना कुठलही समस्या उद्भवत असल्यास तत्काळ मदतीसाठी ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.- पो. नि. दीपक बोरसे

 



तालुका प्रतिनिधी किनवट

महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी तालुका किनवट येथे दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त " कायदा व सुव्यवस्था " या विषयासंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किनवट पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईल तंबाखू गुटखा या व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे आपल्या आई-वडिलांची मान शरमेने खाली झुकेल असे कोणतेही कृत्य करू नये. आपल्या प्रत्येक कृत्याचा आपल्या आई-वडिलांना गुरुजनांना अभिमान वाटला पाहिजे असे आचरण करावे. शाळा महाविद्यालयातील मुलींना शाळा - महाविद्यालयातील किंवा बाहेरच्या मुलांनी त्रास झाल्यास ११२ क्रमांकावर संपर्क करावा तत्काळ मदत मिळेल असे विचार त्यांनी त्या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शुभांगीताई ठमके होत्या.  कार्यक्रमास बोदमवाड साहेबांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात  राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दगडू भरकड यांनी केले तर आभार स्वाती गायकवाड मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक कीर्तीका भंडारे,  रूपाली पाटील मॅडम, प्राध्यापक संतोष चव्हाण, राजेश कदम, प्राध्यापक राजू पाटील, प्राध्यापक संतोष घुले, साहेबराव पाटील, प्रवीण पाटील यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.