Skip to main content

तेलंगणा राष्ट्र समिती(T.R.S.) पक्षाचे माजी खासदार एन. घोडाम यांची किनवट अभीवक्ता संघास भेट...

 



किनवट (तालुका प्रतिनिधी) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय किनवट येथे न दिल्यास किनवट/ माहूर तालुका तेलंगणात जाणार असे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब किनवट यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास  दिल्या नंतर शासन आता काय निर्णय घेईल ही बाब सर्वात महत्वाची असताना आज दिनांक 20/12/2022 रोजी तेलंगाना राष्ट्र समिती जी भारतीय राष्ट्र समिती असे ज्या पक्षाने धारण केले त्या पक्षाचे माजी खासदार यांनी भेट देऊन किनवट/माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी हितगुज केली..

नवोदित वकिलास तेलंगाना राज्यात विकासात्मक योजना आहेत त्या महाराष्ट्रात सुधा सुरू होतील व तेलंगाना राज्या प्रमाणे शेतकऱ्याचा विकास साधण्यासाठी आमचा पक्ष कटिबध्द आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

सदर पक्ष महाराष्ट्रात कसा विजय प्राप्त करेल अथवा अजेंडा कसा राबवेल असे ॲड विलास शामीले (सुर्यवंशी) यांनी विचारले असता माजी खासदार यांनी आम्ही शेतकरी शेतमजूर यांच्या विकासा साठी कटिबध्द आहोत असे सांगितले आमचे शासन तेलंगणात विकास करून तेलंगाना पॅटर्न आमच्या साठी चांगली बाब आहे महाराष्ट्रात विकास करणे हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक सुकर आहे असे सांगितले..

अभिवाक्ता संघाचे उपाध्यक्ष ॲड कुरेशी साहेब यांनी सुधा किनवट माहूर /तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी खासदार साहेब यांना अनेक प्रश्न विचारून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उभारण्यासाठी प्रयत्न करावे त्यावर माजी खासदारांनी तेलंगाना राज्याचे मुख्मंत्री यांना भेटून विनंती तथा सूचना करावी असे सूचित केले लवकरच तेलंगाना राज्याचे मुख्य मंत्री यांना अभिवक्ता संघ भेट देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रां कडून माहिती मिळाली आहे..

तेलंगणा राष्ट्र समिती चे पदाधिकारी भेट देत असल्या मुळे किनवट/माहूर तालुक्या चां विकास साधण्यासाठी निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार आम्ही उभे करणार आहोत तेंव्हा संपूर्ण जनतेने साथ द्यावी अशी विनंती केली..

यावेळी अभिवक्ता संघाचे सचिव ॲड पंकज गावंडे साहेब ॲड ताजने साहेब ॲड. एस. डी. राठोड, ॲड, उदय चव्हाण साहेब ॲड वैद्य साहेब, ॲड. किशोर मुनेश्र्वर साहेब ॲड. येरेकर ॲड. टेकसिंघ चव्हाण ॲड,

कृष्णा राठोड ॲड सोनकांबळे साहेब ॲड नयन मूनेश्र्वर ॲड काळे साहेब ॲड, एम. यु. सर्पे साहेब 

ॲड. पुरुषोत्तमवार साहेब इत्यादी उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.