Skip to main content

१२ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित. माजी आमदार प्रदीप नाईक यांना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण.



किनवट : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी देखील किनवट येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची लगबग व जय्यत तयारी सर्वीकडे पाहण्यास मिळत आहे. मग ते भिंती वरील पेंटींग असो, अॅटो व गाड्यावरील बॅनर व पोस्टर असो, किंवा फेसबुक व व्हाट्सअॅप अशा सोशल नेटवर्किंग साइटवरील पोस्ट असो, सध्या सर्वीकडेच १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची तयारी पाहण्यास मिळत आहे.

          किनवट माहुर विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक काल दिनांक १४ डिसेंबर रोजी किनवट आले असता, १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद च्या टिम नी प्रदिप नाईक यांची भेट घेऊन त्यांना दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण दिले. यावेळी प्रदिप नाईक यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे करपुडे पाटील व किनवट चे माजी नगराध्यक्ष साजिद खान यांना देखील निमंत्रण देण्यात आले. यावेळी १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांच्या सोबत, निखिल वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, राजु नरवाडे, राहुल चौदंते, दत्ता भालेराव, राजु गजभारे, रवी सुर्यवंशी,‌ डीके उमरीकर, अरविंद मुनेश्वर, दिपक कांबळे इत्यादी उपस्थित होते.

         प्रदीप नाईक यांना निमंत्रण दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, या वर्षी ची जागतिक बौद्ध धम्म परिषद खुप आगळी वेगळी करण्याचा प्रयत्न चालु आहे व तसेच टेलीव्हीजन वरील प्रसिद्ध गायकांना या धम्म परिषद ला आमंत्रण दिले आहे, तरी सर्व बौद्ध बांधवांनी आपापल्या परीने होईल त्या प्रकारे या जागतिक बौद्ध धम्म परिषद चा प्रसार व प्रसार करावा आणि दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्व बौद्ध बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजेंद्र शेळके, संयोजक निखिल वाघमारे व सर्व टिमद्वारे करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...