Skip to main content

१२ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित. माजी आमदार प्रदीप नाईक यांना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण.



किनवट : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी देखील किनवट येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची लगबग व जय्यत तयारी सर्वीकडे पाहण्यास मिळत आहे. मग ते भिंती वरील पेंटींग असो, अॅटो व गाड्यावरील बॅनर व पोस्टर असो, किंवा फेसबुक व व्हाट्सअॅप अशा सोशल नेटवर्किंग साइटवरील पोस्ट असो, सध्या सर्वीकडेच १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची तयारी पाहण्यास मिळत आहे.

          किनवट माहुर विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक काल दिनांक १४ डिसेंबर रोजी किनवट आले असता, १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद च्या टिम नी प्रदिप नाईक यांची भेट घेऊन त्यांना दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण दिले. यावेळी प्रदिप नाईक यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे करपुडे पाटील व किनवट चे माजी नगराध्यक्ष साजिद खान यांना देखील निमंत्रण देण्यात आले. यावेळी १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांच्या सोबत, निखिल वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, राजु नरवाडे, राहुल चौदंते, दत्ता भालेराव, राजु गजभारे, रवी सुर्यवंशी,‌ डीके उमरीकर, अरविंद मुनेश्वर, दिपक कांबळे इत्यादी उपस्थित होते.

         प्रदीप नाईक यांना निमंत्रण दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, या वर्षी ची जागतिक बौद्ध धम्म परिषद खुप आगळी वेगळी करण्याचा प्रयत्न चालु आहे व तसेच टेलीव्हीजन वरील प्रसिद्ध गायकांना या धम्म परिषद ला आमंत्रण दिले आहे, तरी सर्व बौद्ध बांधवांनी आपापल्या परीने होईल त्या प्रकारे या जागतिक बौद्ध धम्म परिषद चा प्रसार व प्रसार करावा आणि दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्व बौद्ध बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजेंद्र शेळके, संयोजक निखिल वाघमारे व सर्व टिमद्वारे करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला