Skip to main content

१२ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित. माजी आमदार प्रदीप नाईक यांना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण.



किनवट : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी देखील किनवट येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची लगबग व जय्यत तयारी सर्वीकडे पाहण्यास मिळत आहे. मग ते भिंती वरील पेंटींग असो, अॅटो व गाड्यावरील बॅनर व पोस्टर असो, किंवा फेसबुक व व्हाट्सअॅप अशा सोशल नेटवर्किंग साइटवरील पोस्ट असो, सध्या सर्वीकडेच १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची तयारी पाहण्यास मिळत आहे.

          किनवट माहुर विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक काल दिनांक १४ डिसेंबर रोजी किनवट आले असता, १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद च्या टिम नी प्रदिप नाईक यांची भेट घेऊन त्यांना दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण दिले. यावेळी प्रदिप नाईक यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे करपुडे पाटील व किनवट चे माजी नगराध्यक्ष साजिद खान यांना देखील निमंत्रण देण्यात आले. यावेळी १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांच्या सोबत, निखिल वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, राजु नरवाडे, राहुल चौदंते, दत्ता भालेराव, राजु गजभारे, रवी सुर्यवंशी,‌ डीके उमरीकर, अरविंद मुनेश्वर, दिपक कांबळे इत्यादी उपस्थित होते.

         प्रदीप नाईक यांना निमंत्रण दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, या वर्षी ची जागतिक बौद्ध धम्म परिषद खुप आगळी वेगळी करण्याचा प्रयत्न चालु आहे व तसेच टेलीव्हीजन वरील प्रसिद्ध गायकांना या धम्म परिषद ला आमंत्रण दिले आहे, तरी सर्व बौद्ध बांधवांनी आपापल्या परीने होईल त्या प्रकारे या जागतिक बौद्ध धम्म परिषद चा प्रसार व प्रसार करावा आणि दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्व बौद्ध बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजेंद्र शेळके, संयोजक निखिल वाघमारे व सर्व टिमद्वारे करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...