Skip to main content

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक आज दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले

 



-खासदार हेमंत पाटील; यांनी विद्यार्थ्यांना दिल्ली दौऱ्यासाठी शुभेच्छा देत रवाना केले


नांदेड, दि. २५ (वार्ताहार) ः हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दिल्ली संसदभवन अभ्यास दौरा आणि इतर प्रेक्षणिक स्थळे बघण्यासाठी आज सर्व ५० स्पर्धक व जनसंपर्क अधिकारी दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.  खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  हिंगोलीसह औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव, कळमनुरी, माहूर, किनवट, उमरखेड, हिमायतनगर, महागाव आणि हादगाव या तालुक्यातील साडेतीनशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील पन्नास विजेते स्पर्धक रविवारी (दि.२५) खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी नांदेडच्या हुजूर साहिब रेल्वे स्थानकाहून दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी खासदार हेमंत पाटील व गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी रेल्वे स्थानावर हजर राहुन दिल्लीकडे निघालेल्या विजेत्या स्पर्धकांचे पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी अधिक माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, वक्तृत स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात संसदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे बघता येणार आहे. वास्तूसंग्राहलय, विविध संस्थानच्या भेटी, राष्ट्रपती यांच्या देखील भेटीचा वेळ मिळाला आहे. संसदभवन परिसरासह, ग्रथालय, विज्ञान भवन, पंतप्रधान संग्राहलय यासह विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येणार आहे. विशेष म्हणजे देशाचा महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना भेटता येणार असल्याने सर्व विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पाच दिवसाच्या दौऱ्यात विद्यार्थ्यांना प्रवासा दरम्यान चहा, बिस्कीट, नाष्टा, शुद्ध पिण्याचे पाणी तर दिल्लीत पोहचल्यानंतर राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी सौ. राजश्री पाटील, बाबुराव कदम कोहळिकर, बबन कदम यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.