Skip to main content

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक आज दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले

 



-खासदार हेमंत पाटील; यांनी विद्यार्थ्यांना दिल्ली दौऱ्यासाठी शुभेच्छा देत रवाना केले


नांदेड, दि. २५ (वार्ताहार) ः हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दिल्ली संसदभवन अभ्यास दौरा आणि इतर प्रेक्षणिक स्थळे बघण्यासाठी आज सर्व ५० स्पर्धक व जनसंपर्क अधिकारी दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.  खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  हिंगोलीसह औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव, कळमनुरी, माहूर, किनवट, उमरखेड, हिमायतनगर, महागाव आणि हादगाव या तालुक्यातील साडेतीनशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील पन्नास विजेते स्पर्धक रविवारी (दि.२५) खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी नांदेडच्या हुजूर साहिब रेल्वे स्थानकाहून दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी खासदार हेमंत पाटील व गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी रेल्वे स्थानावर हजर राहुन दिल्लीकडे निघालेल्या विजेत्या स्पर्धकांचे पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी अधिक माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, वक्तृत स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात संसदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे बघता येणार आहे. वास्तूसंग्राहलय, विविध संस्थानच्या भेटी, राष्ट्रपती यांच्या देखील भेटीचा वेळ मिळाला आहे. संसदभवन परिसरासह, ग्रथालय, विज्ञान भवन, पंतप्रधान संग्राहलय यासह विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येणार आहे. विशेष म्हणजे देशाचा महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना भेटता येणार असल्याने सर्व विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पाच दिवसाच्या दौऱ्यात विद्यार्थ्यांना प्रवासा दरम्यान चहा, बिस्कीट, नाष्टा, शुद्ध पिण्याचे पाणी तर दिल्लीत पोहचल्यानंतर राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी सौ. राजश्री पाटील, बाबुराव कदम कोहळिकर, बबन कदम यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला