Skip to main content

दरसांगवी (सि) ग्रा.प.वरती जनता पॅनलचा दणदणीत विजय

  


किनवट प्रतिनिधी:

किनवट तालुक्यातील दरसांगवी (सि) ग्रामपंचायत वरती जनता पॅनल चा झेंडा फडकला ग्रामविकास पॅनलचा व तिसरी आघाडीचा 103 मताने धुवाधार पराभव करत जनता पॅनल ने 403 मते घेत विजयश्री खेचून आणली .दरसांगवी (सि) ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शंशाक सुभाष कनाके हे आपल्या सर्व पॅनलच्या नवनिर्वाचित सदस्यासह बहुमताने निवडुन आले 

दरसांगवी (सि) ग्रामपंचायतची मत मोजणी पार पडली त्यात दरसांगवी (सि) पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे यात जनता पॅनलच्या  सरपंचासह 6 सदस्यांनी विजय मिळवला आहे या निवडणुकीत सरपंच पदी शशांक सुभाष कनाके निवडुन आले तर सदस्य पदी पुंजाराम कनाके 

निर्मला नंदु पवार , सुहास राठोड, शिवकन्या पेंदोर, सुरेखा पवार, शत्रुघ्न मैश्राम, यांनी ग्रामविकास पॅनलचा व तिसरी आघाडीचा धुवाधार पराभव करत जनता पॅनल च्या सरपंच पदासहित 6 सदस्यांनी बाजी मारली किनवट तालुका निवडणूक अधिकाऱ्याकडून विजयी घोषीत करिताच गावकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला 

दरसांगवी (सि) ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती पुरुषासाठी राखीव होते या विजया बद्दल सखाराम पवार,दिलीप राठोड, 

रमेश पवार, शिवा राठोड, मनिराम पवार, संजय पवार, वाघु आत्राम सुभाष कनाके, प्रणय कोवे रमेश परचाके आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...