किनवट प्रतिनिधी:
किनवट तालुक्यातील दरसांगवी (सि) ग्रामपंचायत वरती जनता पॅनल चा झेंडा फडकला ग्रामविकास पॅनलचा व तिसरी आघाडीचा 103 मताने धुवाधार पराभव करत जनता पॅनल ने 403 मते घेत विजयश्री खेचून आणली .दरसांगवी (सि) ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शंशाक सुभाष कनाके हे आपल्या सर्व पॅनलच्या नवनिर्वाचित सदस्यासह बहुमताने निवडुन आले
दरसांगवी (सि) ग्रामपंचायतची मत मोजणी पार पडली त्यात दरसांगवी (सि) पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे यात जनता पॅनलच्या सरपंचासह 6 सदस्यांनी विजय मिळवला आहे या निवडणुकीत सरपंच पदी शशांक सुभाष कनाके निवडुन आले तर सदस्य पदी पुंजाराम कनाके
निर्मला नंदु पवार , सुहास राठोड, शिवकन्या पेंदोर, सुरेखा पवार, शत्रुघ्न मैश्राम, यांनी ग्रामविकास पॅनलचा व तिसरी आघाडीचा धुवाधार पराभव करत जनता पॅनल च्या सरपंच पदासहित 6 सदस्यांनी बाजी मारली किनवट तालुका निवडणूक अधिकाऱ्याकडून विजयी घोषीत करिताच गावकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला
दरसांगवी (सि) ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती पुरुषासाठी राखीव होते या विजया बद्दल सखाराम पवार,दिलीप राठोड,
रमेश पवार, शिवा राठोड, मनिराम पवार, संजय पवार, वाघु आत्राम सुभाष कनाके, प्रणय कोवे रमेश परचाके आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत
Comments
Post a Comment