Skip to main content

बेंदी (तांडा ) ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता चंपत जाधव सरांनी मानले गावकऱ्यांचे आभार



बेंदी :-

बेंदी (तांडा) ग्रामपंचायतचे सरपंच अंजनाबाई मनोहर पेंदोर यांच्यासह सर्व सदस्य भरघोस मताने निवडून आल्याने पॅनल प्रमुख तथा सेवानिवृत्त कर्मचारी चंपत कनीराम जाधव सर यांना गावकऱ्यांच्या प्रेमाची थाप व विकासाची कास या धर्तीवर एक हाती सत्ता दिली.

किनवट पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंदी (तांडा) ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 18/12/2022 रोजी पार पडली या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखेपासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्वीच तीन सदस्य बिनविरोध निवडले गेल्याने बळीराम पाटील कॉलेजचे सेवानिवृत्त कर्मचारी चंपत कनीराम जाधव यांचा आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेत नियोजनबद्ध पद्धतीने गावातील ज्येष्ठ व तरुण मंडळींना सर्व शासकीय योजनांचे महत्त्व पटवून देत प्रचारामधे सर्वांचे मन जिंकून खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक लढविल्याने गेल्या अनेक वर्षापासून बेंदी (तांडा) गावाचा विकास झालेला नाही या कारणामुळे गावातील नागरिकांना प्रतिस्पर्धी यांच्या सर्वच उमेदवारांना बगल देत नवीन उमेदवारांना सरपंचसह सर्वच सदस्य निवडून आणत गावकऱ्यांनी नवीन इतिहास घडवला आहे गावातील मतदारांचे मत घेतले असता मतदारांनी या सर्व बदला मागे सेवानिवृत्त चंपत कराम जाधव यांचा सिंहाचा वाटा मोठ्या प्रमाणात असल्याचे प्रतिनिधी जवळ सांगितले

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...