Skip to main content

तपासात कुठलाही हलगर्जीपणा नको : आमदार भीमराव केराम


 प्रशासनाकडून आश्वासन : आत्महत्याग्रस्त विश्रांतीवर तीस तासांनंतर अंत्यसंस्कार

शवविच्छेदन अहवालासह कारवाईकडे लक्ष

बरडशेवाळा, ता. १५ (बातमीदार) केदारगुडा येथील शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेत चौथीत शिकत असलेल्या दहावर्षीय विद्यार्थिनी विश्रांती बाळू देशमुखे हिने सोमवारी (ता. १२) सायंकाळी आत्महत्या केली होती. या प्रकरणी प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर आत्महत्याग्रस्त विश्रांतीवर तीस तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढे काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.


आत्महत्येची घटना घडल्यानंतर सायंकाळी आश्रमशाळेवर कुटुंबीयांसह गावकरी व समाज बांधवांनी धाव घेऊन गर्दी केली होती. घटनास्थळी तहसीलदार जीवराज डापकर व पोलिस उपविभागीय अधिकारी अफशत आमना यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केली. गर्दी लक्षात घेऊन आणखी पोलिसांची कुमक मागविण्यात आली. आत्महत्येचा तपास योग्य पध्दतीने व्हावा, यासाठी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. १३) दुपारी चार वाजता इन कॅमेरा शवविच्छेदन केले.


दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी मुलीच्या गावातील माळारा येथील गावकऱ्यांसह आदिवासी समाज बांधवांकडून घटनेचा निषेध करीत


दोषीवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका घेत मनाठा पोलिस ठाण्यामध्ये मृतदेहाची प्रतिक्षा करत कुटुंबासह गावातील समाजबांधव ठाण मांडून बसले होते. पोलिस प्रशासनाने शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी अफशत आमना यांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर तीस तासानंतर मंगळवारी रात्री दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमना यांच्या मार्गदर्शनाखाली हदगावचे पोलिस निरीक्षक जगन पवार, मनाठाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, तामसाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दळवी व कर्मचारी उपस्थित होते.


हदगाव / तामसा (बातमीदार) आदिवासी समाजाच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी असून त्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत प्रशासनाला तत्काळ घरकुल मंजूर करण्याचे आदेश आदिवासी समाजाचे नेते आमदार भीमराव केराम यांनी दिले आहेत.


आमदार केराम यांनी ज्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीने आत्महत्या केली त्या आश्रमशाळेला भेट देऊन संबंधित प्रशासनासोबत चर्चा केली. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे आमदार केराम यांच्याकडून सांगण्यात आले. आमदार केराम म्हणाले की, आदिवासी समाजाच्या योजनेतून प्रत्येक योजनेचा लाभ या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी लक्ष घालणार असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही स्पष्ट केले. आदिवासी आश्रमशाळेच्या प्रशासनाला यानंतर अशा घटना घडू नये, त्यासाठी प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज असल्याचे सांगत यापुढे कुठलाही हलगर्जीपणा सहन करून घेणार नसल्याचेही सांगण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, भाजपाचे तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे

हदगाव आमदार भीमराव केराम यांनी देशमुखे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.


पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, संतोष मारसकोल्हे आदी उपस्थित होते.

आदिवासी मंत्र्यांची लवकरच घेणार भेट चौथ्या वर्गात शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने देशमुखे कुटुंबीयावर संकट ओढावले आहे. त्यामुळे त्यांना धीर देण्याची गरज असून आदिवासी समाजाच्या योजनेचा लाभ


मिळावा व या कुटुंबीयाला दुःखाच्या संकटातून सावरण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच आदिवासी मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार केराम यांनी सांगितले. आमदार केराम यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचा सानुग्रह धनादेश देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...