Skip to main content

नागरिकांचे संवैधानिक अधिकार सुरक्षेसाठी संविधानवादी सरकार आणावे लागेल- शेख सुभान अली सर प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 


शिर्डी:-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन दिवसीय शिबीर  घेण्यात आले 

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवणारा पक्ष असून भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे.


नागरिकांचे संवैधानिक अधिकार सुरक्षेसाठी संविधानवादी सरकार आणावे लागेल.....

शिबिरात आपले मत व्यक्त करताना

शेख सुभान अली सर

प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या शिबिराचा पहिला दिवस आज संपन्न झाला. या संपूर्ण दिवसात अनेक नामांकित वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या शिबिराची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या विषयावर कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमात झालेल्या प्रत्येक मान्यवरांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले.




पुढे अनुक्रमे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी 'महाराष्ट्राच्या निर्मितीची गोष्ट', जे. एफ. पाटील यांनी 'जागतिक आर्थिक परिस्थिती व भारतीय अर्थव्यवस्था', सुभान आली शेख यांनी 'अल्पसंख्याक समाजा संदर्भात विषय', राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी 'केंद्रीय यंत्रणांचा राजकारणासाठी वापर', राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी 'धर्माचे वाढते राजकारण व देशातील सद्यस्थिती', प्रभाकर देशमुख यांनी 'राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना', राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी 'सांस्कृतिक राजकारण', लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी 'आयडिया ऑफ इंडिया', जेएनयु विद्यापीठामधील अभ्यासक मिलिंद आव्हाड यांनी 'सामाजिक न्याय व राज्यघटना' (समाजकारण व राजकारण) या विषयांवर मार्गदर्शन केले

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...