नागरिकांचे संवैधानिक अधिकार सुरक्षेसाठी संविधानवादी सरकार आणावे लागेल- शेख सुभान अली सर प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शिर्डी:-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन दिवसीय शिबीर घेण्यात आले
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवणारा पक्ष असून भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे.
नागरिकांचे संवैधानिक अधिकार सुरक्षेसाठी संविधानवादी सरकार आणावे लागेल.....
शिबिरात आपले मत व्यक्त करताना
शेख सुभान अली सर
प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या शिबिराचा पहिला दिवस आज संपन्न झाला. या संपूर्ण दिवसात अनेक नामांकित वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या शिबिराची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या विषयावर कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमात झालेल्या प्रत्येक मान्यवरांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले.
पुढे अनुक्रमे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी 'महाराष्ट्राच्या निर्मितीची गोष्ट', जे. एफ. पाटील यांनी 'जागतिक आर्थिक परिस्थिती व भारतीय अर्थव्यवस्था', सुभान आली शेख यांनी 'अल्पसंख्याक समाजा संदर्भात विषय', राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी 'केंद्रीय यंत्रणांचा राजकारणासाठी वापर', राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी 'धर्माचे वाढते राजकारण व देशातील सद्यस्थिती', प्रभाकर देशमुख यांनी 'राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना', राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी 'सांस्कृतिक राजकारण', लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी 'आयडिया ऑफ इंडिया', जेएनयु विद्यापीठामधील अभ्यासक मिलिंद आव्हाड यांनी 'सामाजिक न्याय व राज्यघटना' (समाजकारण व राजकारण) या विषयांवर मार्गदर्शन केले
Comments
Post a Comment