Skip to main content

नागरिकांचे संवैधानिक अधिकार सुरक्षेसाठी संविधानवादी सरकार आणावे लागेल- शेख सुभान अली सर प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 


शिर्डी:-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन दिवसीय शिबीर  घेण्यात आले 

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवणारा पक्ष असून भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे.


नागरिकांचे संवैधानिक अधिकार सुरक्षेसाठी संविधानवादी सरकार आणावे लागेल.....

शिबिरात आपले मत व्यक्त करताना

शेख सुभान अली सर

प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या शिबिराचा पहिला दिवस आज संपन्न झाला. या संपूर्ण दिवसात अनेक नामांकित वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या शिबिराची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या विषयावर कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमात झालेल्या प्रत्येक मान्यवरांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले.




पुढे अनुक्रमे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी 'महाराष्ट्राच्या निर्मितीची गोष्ट', जे. एफ. पाटील यांनी 'जागतिक आर्थिक परिस्थिती व भारतीय अर्थव्यवस्था', सुभान आली शेख यांनी 'अल्पसंख्याक समाजा संदर्भात विषय', राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी 'केंद्रीय यंत्रणांचा राजकारणासाठी वापर', राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी 'धर्माचे वाढते राजकारण व देशातील सद्यस्थिती', प्रभाकर देशमुख यांनी 'राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना', राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी 'सांस्कृतिक राजकारण', लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी 'आयडिया ऑफ इंडिया', जेएनयु विद्यापीठामधील अभ्यासक मिलिंद आव्हाड यांनी 'सामाजिक न्याय व राज्यघटना' (समाजकारण व राजकारण) या विषयांवर मार्गदर्शन केले

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला