Skip to main content

शेतकर्‍यांनी ई- के वाय सी करून घ्यावी - तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांचे अवाहन

 



किनवट ता.प्र दि ०६ शेतक-यांना वारंवार आवाहन करुन देखील किनवट तालुक्यातील ९२११ शेतक-यांनी अद्यापही आपला ई-के. वाय. सीन केल्याने आगामी काळात त्यांना मिळणारे पीएम- किसान योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो यामुळे पुढील एक आठवड्यात शेतक-यांनी आपली ई- के.वाय. करुन घ्यावी असे आवाहन डॉ मृणाल जाधव तहसिलदार किनवट यांनी केले आहे.

केंद्र सरकार ने सन २०१७ पासुन शेतक-यांना वार्षीक ६००० रुपये प्रमाणे २००० हजार रुपयाच्या हप्त्याप्रमाणे अनुदान अशी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम व अटी लावण्यात आल्या होत्या परंतु सुरवातीला सरसकट शेतक-यांनी या योजने करिता नोंदणी केली होती परंतु नंतर महसुल प्रशासनाव्दारे या योजनेतील नियम व अटी प्रमाणे लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली जसे आयकर भरणारे, नोकरी करणारे, एकाच कुटुंबात अनेकांची नावे, राजकारणी, संवैधानिक पदाचा लाभ घेणारे अशा लाभार्थ्यांना वगळण्यात आले. ती नावे वगळल्या नंतर आता या योजनेच्या पोर्टल मध्ये फक्त शेतक-यांची नावेच शिल्लक राहिलेली आहे. सदर योजनेला पीएम किसान या नावावे ओळखले जात असल्याने या पोर्टलचे नाव हि पीएम किसान असे ठेवण्यात आले आहे. तर किनवट तालुक्यातील ९२११ असे शेतकरी आहे ज्यांचा अजुन ही ई-के. वाय. सी झालेला नाही. त्यांनी येत्या एका आठवड्यात आपली ई-के. वाय. सी करुन घ्यावी असे आवाहन तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
ई-के. वाय. सी करिता अत्यंत सोपी पध्दत आहे शेतक-यांनी आपल्या जवळच्या सेतु सुविधा केंद्र, सि. एस. सी केंद्र किंवा तहसिल कार्यालयात जाऊन आपला आधार क्रमांक सांगुन नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ.टी.पी नोंदवणे आहे. किंवा ज्यांना ओ.टी.पी ने शक्य नाही अशानी आपल्या हातांच्या ठश्याने ई- के.वाय.सी करावयाचा आहे. ज्या शेतक-यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मोबाईल किंवा घरातील संगणकावर देखिल पीएम- किसान च्या वेबसाईट वरती जाऊन सोप्या पध्दतीने आपली ई - केवासी करुन घ्यावी.




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...