Skip to main content

प्रवाशांना बस रद्द झाल्याची सूचना न दिल्यामुळे एसटी महामंडळाला ६ हजाराचा दंड तक्रार निवारण आयोगाने व्यवस्थापकाला प्रवाशी नुकसान भरपाई बद्दल दिले आदेश

 


माहूर : गावाकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी प्रवाशांनी कोल्हापूर -  लातूर जाणाऱ्या बसचे सांगलीपासून लातूर पर्यंत तीन सीट आरक्षीत केले मात्र ती बस रद्द झाल्याची पूर्व सूचना प्रवाशांना न दिल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आगार व्यवस्थापकाला ३ हजार रुपये दंड, मानसिक त्रासापोटी २ हजार तर तक्रारीसाठी १ हजार असे एकुण ६ हजार रुपये प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश  आगार व्यवस्थापकाला  दिले.


नांदेड जिल्ह्याच्या माहुर तालुक्यातील तुळशी गावाचे सरपंच नितीन मंडाले यांनी २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी कोल्हापूर - लातूर जाणाऱ्या बसचे सांगलीपासून लातूर पर्यंत ३ सीट आरक्षीत केले. त्याबद्दल त्यांनी महामंडळला सेवेचा मोबदला 2034 रुपये दिले. व त्याच्या कुटूंबातील सदस्यांसह सांगली बसस्थानकात बसची वाट बघत बसले. बराच वेळ ताटकळत बसल्यानंतर बसची निश्चित वेळ होऊन त्यामुळे प्रवाशी नितीन मांडले यांनी चौकशी विभागात विचारपूस केली तेव्हा त्यांना कळाले लातूर जाणारी बस रद्द झाली आहे.


मंडाले यांनी तिकीट आरक्षित करत असताना स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता परंतु, आगार व्यवस्थापकानी त्यांना बस रद्द झाल्याची कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही त्यामुळे मंडाले व त्यांचा कुटूंबातील सदस्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी ऍड. सचिन भीमराव दारवंडे यांच्या मार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करून ५० हजार रुपये नुकसाभरपाई देण्याची मागणी केली.

ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा सातपुते, सदस्य रविंद्र बिलोलीकर, श्रीमती कविता देशमुख यांनी मंडाले आणि आगार व्यवस्थापक अधिकारी या दोघांची बाजू ऐकून घेतली. ग्राहक आयोगाने त्यानंतर मंडाले यांची तक्रार अंशतः मंजुर करून तिकिटाची एकूण रक्कम ३ हजार रुपये मंडाले यांना परत देण्याचे आदेश दिले तसेच आगार व्यवस्थापक यांना मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून २ हजाराचा दंड ठोठावला व ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी लागलेला खर्च १ हजार रुपये असे एकुण ६ हजार रुपये मंडाले यांना देण्याचा आदेश दिले. सदरील प्रकरणात मंडाले यांची बाजू ऍड सचिन भीमराव दारवंडे यांनी व आगार व्यवस्थापकांची बाजू संदीप पवार यांनी मांडली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...