Skip to main content

किनवट मध्ये आज संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन

 


किनवट:-

 भारतीय संविधान- दिनानिमित्त युवा प्रबोधन मंच शाखा किनवटच्या वतीने दि 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत किनवट येथे संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन केले असून यानिमित्त प्रख्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधना चा कार्यक्रम, व्याख्यान, सावधान रॅली, संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा प्रबोधन मंचच्या वतीने करण्यात आले आहे.


भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी तसेच संविधानाप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने युवा प्रबोधन मंच शाखा किनवटच्या वतीने दि 24 व 26 नोव्हेंबर असे दोन दिवस येथील गोंदराजे मैदानात संविधान जागृती महोत्सव आयोजित केला आहे कार्यक्रमाच्या


अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके हे राहणार असून आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर, खा हेमंत पाटील, मा खा सुभाष वानखेडे, प्रा गोविंद दळवी, फारुख अहेमद, माजी आ प्रदीप नाईक, जि प च्या माजी अध्यक्षा जनाबाई डूडुळे, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी फारूक अहमद राजेश्वर हत्तीआंबिरे माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान प्रशांत ठमके नामदेवराव केशवे, सुधाकर भोयर, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अनिल तिरमनवार, सचिन नाईक, उपनगराध्यक्ष व्यंकट नेमानीवार, प्रफुल राठोड, संध्या वाचन राठोड, विनोद भरणे, नारायण सिडाम, व्यंकटराव नेमानीवार, प्रकाश गब्बा राठोड, सोपान केंद्रे, दिनकर दहिफळे, रविकांत सर्पे, विकास कुडमते, जयवंत वनोळे यांच्यासह विविध पक्षाचे तसेच सामाजिक संघटनेचे नेते उपस्थित


राहणार आहेत. जोतिबा खराटे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत, माजी नगराध्यक्ष साजिद खान स्वागताध्यक्ष, राजेंद्र शेळके संयोजक तर दत्ता कसबे हे स्वागतोतुस्क आहेत. दि 24 नोव्हेंबर रोजी सांय 6 वा प्रा डॉ अनंत राऊत यांचे "लोक कल्याणकारी संविधान व संविधानाने दिलेल्या अधिकाराचे लाभ घेणारे संविधान मूल्यानुसार वागतात काय ?" या विषयावर व्याख्यान होईल व त्यानंतर प्रख्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा सत्यपालाची सत्यवाणी हा प्रबोधनाचा कार्यक्रम गोंडराजे मैदानत आयोजित केला आहे 26 नोव्हेंबर रोजी संविधान रॅली, संविधान उद्देशिकेचे सामूहिक व संविधान जागृती महोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सुरेश जाधव, माधवराव कावळे, शंकर नगराळे, विशाल हलवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला