Skip to main content

किनवट मध्ये आज संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन

 


किनवट:-

 भारतीय संविधान- दिनानिमित्त युवा प्रबोधन मंच शाखा किनवटच्या वतीने दि 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत किनवट येथे संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन केले असून यानिमित्त प्रख्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधना चा कार्यक्रम, व्याख्यान, सावधान रॅली, संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा प्रबोधन मंचच्या वतीने करण्यात आले आहे.


भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी तसेच संविधानाप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने युवा प्रबोधन मंच शाखा किनवटच्या वतीने दि 24 व 26 नोव्हेंबर असे दोन दिवस येथील गोंदराजे मैदानात संविधान जागृती महोत्सव आयोजित केला आहे कार्यक्रमाच्या


अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके हे राहणार असून आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर, खा हेमंत पाटील, मा खा सुभाष वानखेडे, प्रा गोविंद दळवी, फारुख अहेमद, माजी आ प्रदीप नाईक, जि प च्या माजी अध्यक्षा जनाबाई डूडुळे, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी फारूक अहमद राजेश्वर हत्तीआंबिरे माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान प्रशांत ठमके नामदेवराव केशवे, सुधाकर भोयर, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अनिल तिरमनवार, सचिन नाईक, उपनगराध्यक्ष व्यंकट नेमानीवार, प्रफुल राठोड, संध्या वाचन राठोड, विनोद भरणे, नारायण सिडाम, व्यंकटराव नेमानीवार, प्रकाश गब्बा राठोड, सोपान केंद्रे, दिनकर दहिफळे, रविकांत सर्पे, विकास कुडमते, जयवंत वनोळे यांच्यासह विविध पक्षाचे तसेच सामाजिक संघटनेचे नेते उपस्थित


राहणार आहेत. जोतिबा खराटे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत, माजी नगराध्यक्ष साजिद खान स्वागताध्यक्ष, राजेंद्र शेळके संयोजक तर दत्ता कसबे हे स्वागतोतुस्क आहेत. दि 24 नोव्हेंबर रोजी सांय 6 वा प्रा डॉ अनंत राऊत यांचे "लोक कल्याणकारी संविधान व संविधानाने दिलेल्या अधिकाराचे लाभ घेणारे संविधान मूल्यानुसार वागतात काय ?" या विषयावर व्याख्यान होईल व त्यानंतर प्रख्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा सत्यपालाची सत्यवाणी हा प्रबोधनाचा कार्यक्रम गोंडराजे मैदानत आयोजित केला आहे 26 नोव्हेंबर रोजी संविधान रॅली, संविधान उद्देशिकेचे सामूहिक व संविधान जागृती महोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सुरेश जाधव, माधवराव कावळे, शंकर नगराळे, विशाल हलवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...