Skip to main content

मांडवी येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

 


मांडवी प्रतिनिधी :

मांडवी  येथे  दि. 20/11022 रोजी  भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आलेली असून सर्व धर्म समभाव या या विचाराने सर्व समाजातील व्यक्ती सहभागी झाले

 या दरम्यान मांडवी येथे किनवट - माहुर विधानसभा  आमदार श्री भिमराव केराम यांचे विशेष उपस्थिती होती  मांडवी येथील सांस्कृतिक भवन विकास कामासाठी दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली  मांडवी हे शहर हमेशा समभाव विचाराने चालणारे शहर आहे या शहरात स्वर्गीय माजी महसूल मंत्री उत्तमराव राठोड साहेब यांच्या  विचाराने चालणारे व विकासाची कारणे शहर आहे व या विकासाच्या कामास सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात गावातील सर्व समाजाचे मानेवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधन करताना माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रफुल राठोड यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले

 संध्याताई राठोड यांनी मांडवी येथील सर्व धर्म समभाव विचाराने राहत असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची जातीय दंगल  घडलेली नाही असे प्रतिपादन केले. तसेच श्री. मा. बाबाराव राठोड यांनी मांडवी येथील  बिरसा मुंडा सभागृहाची नोंद करण्यात यावी व संरक्षण भीती मंजूर करण्यात यावे अशी अनेक मागण्या करण्यात आल्या.मा. श्री धनलाल पवार यांनी मांडवी तालुका करण्याचे मागणी केली . या कार्यक्रमास पुढील मान्यवरांची उपस्थित लाभलेली होती सरपंच सुमनबाई पेदोर , उपसरपंच सरोजाताई कार्तिक चव्हाण, सुखदेव डोंगरे, नवीन डोंगरे, दीपक नागभिडे, विनोद मेश्राम, निखिल कनाके, भारत कनाके, मनोज पूसनाके, मारुती कनाके आदी मान्यवरांनी सहभाग नोंदविला तर सूत्रसंचालन मडावी सर यांनी केले

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...