Skip to main content

जुन्या नगर परिषदे समोरील संविधान स्तंभा भोवतालचे अतिक्रमण त्वरीत काढुन सुशोभीकरण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा- सिद्धार्थ नगर नवयुवक मंडळ व युवा पँथरचे तहसिलदार यांना निवेदन



किनवट बातमीदार:-

किनवट शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुन्या नगर परिषदे समोरील लोकशाहीचे प्रतिक असलेले संविधान स्तंभ( स्मारक) हे फार जीर्न झाले असुन त्याच्या भोवताल परीसरात आईस्क्रीमचे , पाणीपुरी विक्रेते व इतर हातगाड्यांनी अतिक्रमण केले असुन ते वापरलेले प्लास्टीक ग्लास , पिशव्या तसेच धुतलेले सांडपाणी संविधान स्मारकाची विटंबना करीत आहेत .

संविधान स्मारक हे जुन्या काळातील मुख्य चौक असुन स्वातंत्र्य समता बंधुता व एकतेची प्रेरणा देणारे स्थळ आहे या कडे नगर परिषद प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन संविधान प्रेमी नागरीकांकडुन येत्या २६ नोव्हेंबरला संविधान स्मारक येथे संविधान गौरव दिन , रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रम होणार आहे तरी त्वरीत  बाजुचे अतिक्रमण काढून संविधान स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे या आशयाचे निवेदन मा. तहसिलदार यांना देण्यात आले तसेच त्याच्या प्रतिलिपी , मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय किनवट , उपविभागीय कार्यालय किनवट, पोलिस निरीक्षक साहेब , पोलीस ठाणे यांना सादर करण्यात आले आहेत सदरील निवेदनावर सतिष उत्तमराव कापसे, प्रदुमन राठोड, ओमकार शर्मा, आकाश आळणे, स्वप्नील सर्पे, संघर्ष घुले, राजेंद्र भातनासे, ब्रम्हानंद एडके, निखील ओंकार, शुभम पाटील, विनोद सी भरणे, निखील कावळे, सुमेध कापसे, विनोद रावळे, अतीफ शेख, अनिल कांबळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत तर राजेश पाटील ,प्रशांत ना. ठमके , प्रतीक नगराळे, सुगत भरणे,

आदर्श शिलवंत येरेकर , कामेश मुनेश्वर , वसंत नगराळे , सम्राट सर्पे सर्प , गौतम पाटील यासह युवा पँथर आंबेडकरी संघटनेचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.