Skip to main content

देशातील सर्वात उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरु

 



तेलंगणा:-

तेलंगणा मधील हैदराबाद:- शहरातील हुसेनसागर तलावाशेजारी असलेल्या एनटीआर गार्डनजवळील 10 एकर जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरु आहे. पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्याची तयारी तेलंगणा सरकार करत आहे.

देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होईल. तसेच या 10 एकर परिसरात लेझर शो व्यतिरिक्त पुतळ्याच्या पायथ्याशी संसदेसारखी रचना केली जात आहे. डॉ.आंबेडकरांचे महानतेचे दर्शन घडविण्यासाठी डॉ.आंबेडकरांचे फोटो गॅलरी आणि मिनी थिएटर उभारण्यात येत आहे.

डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयात डॉ.आंबेडकरांच्या संसदेत केलेल्या भाषणांचा वीडिओ आणि त्यांच्या जीवनावर आधारित फिचर फिल्म सुद्धा लोकांना दाखवले जातील.


2016 मध्ये पायाभरणी

14 एप्रिल 2016 रोजी डॉ.आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळा बसविण्याची पायाभरणी करण्यात आली होती. एस.सी कॉपोरेशनच्या वतीने रस्ते आणि इमारत विभाग सुमारे 150 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवत आहे. हा पुतळा अंदाजे 45 फूट रुंद असेल, ज्यामध्ये 9 टन वजनाचा कांस्य त्वचेचा लेप असेल, पुतळ्याची फ्रेम 155 टन स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आली आहे.


Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...