Skip to main content

देशातील सर्वात उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरु

 



तेलंगणा:-

तेलंगणा मधील हैदराबाद:- शहरातील हुसेनसागर तलावाशेजारी असलेल्या एनटीआर गार्डनजवळील 10 एकर जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरु आहे. पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्याची तयारी तेलंगणा सरकार करत आहे.

देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होईल. तसेच या 10 एकर परिसरात लेझर शो व्यतिरिक्त पुतळ्याच्या पायथ्याशी संसदेसारखी रचना केली जात आहे. डॉ.आंबेडकरांचे महानतेचे दर्शन घडविण्यासाठी डॉ.आंबेडकरांचे फोटो गॅलरी आणि मिनी थिएटर उभारण्यात येत आहे.

डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयात डॉ.आंबेडकरांच्या संसदेत केलेल्या भाषणांचा वीडिओ आणि त्यांच्या जीवनावर आधारित फिचर फिल्म सुद्धा लोकांना दाखवले जातील.


2016 मध्ये पायाभरणी

14 एप्रिल 2016 रोजी डॉ.आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळा बसविण्याची पायाभरणी करण्यात आली होती. एस.सी कॉपोरेशनच्या वतीने रस्ते आणि इमारत विभाग सुमारे 150 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवत आहे. हा पुतळा अंदाजे 45 फूट रुंद असेल, ज्यामध्ये 9 टन वजनाचा कांस्य त्वचेचा लेप असेल, पुतळ्याची फ्रेम 155 टन स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आली आहे.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.