Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलिसांचा सन्मान

 


पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन


पिंपरी चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवडच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलिसांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नवरात्रीचे औचित्य साधून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस व वाहतूक क्षेत्रातील महिला रस्त्यावर रक्षणासाठी उतरतात आणि अडी अडचणीवर मात करत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व बजावत असतात. यासाठी वेळेचे बंधन न पाळता जनतेच्या संरक्षणाची जोखीम सांभाळताना घर, शिवाय जनता यांच्यामधील कसरत, समतोल सांभाळत आपले योगदान देतात. त्यांच्या या कामाचे श्रेय त्यांना मिळावे, त्यांचा गौरव व्हावा, त्यांना सन्मान मिळावा या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने पोलीस तसेच वाहतूक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, शहराध्यक्ष संतोष रणसिंग, महिला शहराध्यक्षा सौ मंदा बनसोडे, शहनाज कुरणे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शाखेच्या पदाधिकाऱ्यानी हा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतल्यामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...