Skip to main content

उत्तम व्यवसाईक, समाजकार्यकर्ता बनण्यासाठी बातमी लिहीण्याचे कौशल्ये आवगत करणे गरजेचे ; एड. मिलिंद सर्पे

 


किनवट,९ : व्यवसाईक व समाजकार्यकर्ता बनण्यासाठी बातमी लिहीण्याचे कौशल्ये अवगत करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन पत्रकार अॅड. मिलिंद सर्पे यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे (कै.) उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रात, शनिवारी(दि.८) संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली समाजकार्य कौशल्ये प्रयोग शाळा पार पडली.यावेळी ते बोलत होते.

   अध्यक्षीय समारोह प्रसंगी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले म्हणाले की, अँड. सर्पे यांनी समाजकार्य कौशल्ये प्रयोगशाळेच्या माध्यमातून संशोधन केंद्रातील सर्व समाजकार्य प्रशिक्षणार्थीना बातमी लिहीण्याचे  कौशल्ये शिकविले आहे,ते केंद्राचे विद्यार्थी आत्मसात करतील. 

सुरुवातीला समाजकार्य कौशल्ये प्रयोग शाळेची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा. उमाकांत इंगोले यांचा सत्कार समाजकार्य प्रशिक्षणार्थी शेख अर्षद यांनी केले. प्रमुख साधन व्यक्ती अँड. मिलींद सर्पे यांचा सत्कार संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले आणि समाजकार्य प्रशिक्षणार्थी माजळकर कानुपात्रा यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजकार्य प्रशक्षिणार्थी पवार सचिन यांनी केले, तर पेंदोर आशा हीने आभार मानले. 

ही प्रयोगशाळा यशस्वी करण्यासाठी माजी समाजकार्य प्रशिक्षणार्थी रविंद्रनाथ गुंडेवाड, भोपे उषा, जाधव प्रणिता, कोल्हे दीपक, राठोड कृष्णवेणी, सय्यद जीशन, डुडूळे प्रियंका, राउत अंकेत आणि तोडसाम सोनाली यांनी पुढाकार घेतला.

ही प्रयोगशाळा आयोजित करण्यासाठी विद्यापीठाचे कुलुगुरु प्रा. डॉ. उध्दवराव भोसले सर, प्रकुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे प्राध्यापक व संचालक डॉ. घन:श्याम येळणे , संशोधन केंद्राचे सह - समन्वयक डॉ. गोवर्धन लांब, डॉ. योगेश आंबुलगेकर आणि डॉ. शिवाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...