Skip to main content

वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे उपयुक्त आहे- नारायणराव सिडाम

 



(शहर प्रतिनिधी: किनवट)

वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे उपयुक्त आहे.ग्रंथ हेच माणसाचे गुरु आहेत. जीवनातील अनेक प्रश्नांचे उत्तर हे पुस्तकातून मिळत असते.असे मत स्वंतत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व डॉ एस . आर . रंगनाथन जयंती निमित्त बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित भव्य ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम यांनी व्यक्त केले. 

    प्रारंभी थोर समाजसुधारक कै. बळीराम पाटील, डॉ .एस.आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रमास किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, सचिव शंकरराव चाडावार, कोष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी, प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर,संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती.


हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. पुढे बोलतांना नारायणराव सिडाम साहेब म्हणाले की, आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालय हे समृद्ध आहे.स्वतंत्र भारतातील क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारीत विविध प्रसिद्ध लेखकांची महत्वपूर्ण ग्रंथ उपलब्ध आहेत.भारतीय संविधानाची मूळ प्रत ही ग्रंथालयात उपलब्ध आहे. 

कथा, कविता, कादंबरी, संशोधनात्म, वैचारिक पुस्तके,कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांचे पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनाचे दालन खुले करणारे आहे.अत्यंत मोकळे व प्रशंसनीय वाचनकक्ष आहे. नियमित वर्तमान पत्र येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज भरविलेले हे ग्रंथ प्रदर्शन वाचन संस्कृतीला वृध्दिंगत करण्यासाठी महत्वाचे आहे.असे मत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ .एस .आर.रंगनाथन यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे 'जाणीवा ' भित्तीपत्रकांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. आम्रपाली हटकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल मंदाकिनी राठोड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जी.बी.लांब,डाॅ.आनंद भालेराव, प्रा. किशन मिराशे, महाविद्यालयातीलअमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. ममता जोनपेल्लीवार  डॉ. सुरेंद्र शिंदे, डॉ. रत्ना कोमावार, प्रा. विजय खूपसे, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ. शुभांगी दिवे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शेषराव माने, प्रा.सुलोचना जाधव, डॉ. रचना हिपळगावकर, डॉ. स्वाती कुरमे,डाॅ.श्रीनिवास रेड्डी, डाॅ.विजया खामनकर, प्रा. दयानंद वाघमारे, प्रा . सतिश मिराशे 'प्रा. अजय पाटील, दीपक खंदारे, मिलिंद लाकडे, गौरव पवार, काशिनाथ पिंपरे, एन. जी. पवार,राजू पुठ्ठावार,सुधीर पाटील आदि. परिश्रम घेतले. आभार ग्रंथपाल मंदाकिनी राठोड यांनी मानले. राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला