(शहर प्रतिनिधी: किनवट)
वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे उपयुक्त आहे.ग्रंथ हेच माणसाचे गुरु आहेत. जीवनातील अनेक प्रश्नांचे उत्तर हे पुस्तकातून मिळत असते.असे मत स्वंतत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व डॉ एस . आर . रंगनाथन जयंती निमित्त बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित भव्य ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम यांनी व्यक्त केले.
प्रारंभी थोर समाजसुधारक कै. बळीराम पाटील, डॉ .एस.आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रमास किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, सचिव शंकरराव चाडावार, कोष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी, प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर,संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती.
हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. पुढे बोलतांना नारायणराव सिडाम साहेब म्हणाले की, आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालय हे समृद्ध आहे.स्वतंत्र भारतातील क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारीत विविध प्रसिद्ध लेखकांची महत्वपूर्ण ग्रंथ उपलब्ध आहेत.भारतीय संविधानाची मूळ प्रत ही ग्रंथालयात उपलब्ध आहे.
कथा, कविता, कादंबरी, संशोधनात्म, वैचारिक पुस्तके,कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांचे पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनाचे दालन खुले करणारे आहे.अत्यंत मोकळे व प्रशंसनीय वाचनकक्ष आहे. नियमित वर्तमान पत्र येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज भरविलेले हे ग्रंथ प्रदर्शन वाचन संस्कृतीला वृध्दिंगत करण्यासाठी महत्वाचे आहे.असे मत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ .एस .आर.रंगनाथन यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे 'जाणीवा ' भित्तीपत्रकांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. आम्रपाली हटकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल मंदाकिनी राठोड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जी.बी.लांब,डाॅ.आनंद भालेराव, प्रा. किशन मिराशे, महाविद्यालयातीलअमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. ममता जोनपेल्लीवार डॉ. सुरेंद्र शिंदे, डॉ. रत्ना कोमावार, प्रा. विजय खूपसे, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ. शुभांगी दिवे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शेषराव माने, प्रा.सुलोचना जाधव, डॉ. रचना हिपळगावकर, डॉ. स्वाती कुरमे,डाॅ.श्रीनिवास रेड्डी, डाॅ.विजया खामनकर, प्रा. दयानंद वाघमारे, प्रा . सतिश मिराशे 'प्रा. अजय पाटील, दीपक खंदारे, मिलिंद लाकडे, गौरव पवार, काशिनाथ पिंपरे, एन. जी. पवार,राजू पुठ्ठावार,सुधीर पाटील आदि. परिश्रम घेतले. आभार ग्रंथपाल मंदाकिनी राठोड यांनी मानले. राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment