Skip to main content

टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे सिरजखोड ता.धर्माबाद येथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार


धर्माबाद /सय्यद नदीम

टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिरजखोड (मराठी आणि उर्दू माध्यम) येथे आज शिक्षक दिनानिमित्त टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि धर्माबाद तालुकाध्यक्ष मिर्झां खुर्रम पटेल,  तालुका उपाध्यक्ष मिर्झां इब्राहिम बेग यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षक दिन कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख अहेमद मिरा साब, शेख नसीम मॅडम, आनलदास एस. वी. मॅडम, गज़ाला जबीन मॅडम, मिर्झां सलीम बेग सर, मोहम्मद सुलतानउद्दीन सर, सज्जन प्रसराम मामा यांच्यासह धर्माबाद पंचायत समितीमधील शिक्षण विभागात विषय तज्ञ म्हणून कार्यरत मनोहर बोपटे सर आणि भत्ते सर यांचा सुद्धा पुष्पहार आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला.

        याप्रसंगी सिरजखोडचे भूमिपुत्र, या शाळेचे माजी विद्यार्थी, टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की "विद्यार्थ्यांनी खूप-खूप शिकले पाहिजे. एक आदर्श शिक्षक, डाॅक्टर, इंजीनियर, वकील, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी आणि देशाचे एक आदर्श नागरिक बनले पाहिजे. ते पुढे म्हणाले की देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान खूप मोलाचे आहे. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान होणे गरजेचे आहे. 

 शिक्षकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मूल्ये रूजविण्यासाठी प्रयत्न करावे. टिपू सुलतान ब्रिगेड ही मानव सेवा आणि देश सेवेस समर्पित युवकांची संघटना आहे."

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तालुकाध्यक्ष मिर्झां खुर्रम पटेल यांनी केले, 

सुलतानउद्दीन सरांनी सूत्रसंचालन केले, मुख्याध्यापक शेख अहेमद यांनी मनोगत व्यक्त केले आणि शेवटी टिपू सुलतान ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष मिर्झां इब्राहिम बेग यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला