Skip to main content

शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालविली शाळा.

 


कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लीश स्कुल मध्ये शिक्षक दिन साजरा.



प्रतिनिधी : मजहर शेख,सारखणी

सारखणी,दि,६- शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशे शिक्षणाचे महत्व डॉ. बाबासाहेबांनी सांगितले आहे.दिनांक ५ सप्टेबंर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधुन   कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लीश स्कुल येथे शिक्षकदिनानिमित्त या अभिनव उपक्रमात विद्यार्थीच मुख्याध्यापक व शिक्षक होऊन  विद्यार्थ्यांनी चालविली शाळा.याप्रसंगी  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .



 यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके  तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मिसेवार,बळवंत वाढई ,सय्यद सौरभ उपस्थित होते.या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर निर्माण होऊन त्यांच्या आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत  सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी व्यक्त केले .शिक्षकांनी उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांचे देखील त्यांनी कौतुक केल . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषा परीधान केल्या होत्या.तसेच प्रमुख अतिथीनी शिक्षक दिना बद्दल माहीती  सांगीतली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पंकज राठोड व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...