Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध मान्यवरांचा सन्मान

 



जिद्द, मेहनत, चिकाटी, परिश्रमातून समाजकार्याला मिळते प्रेरणा : राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे


भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिणीस संजीव भांबोरे यांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त पवनी तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा चीचाळ येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणस संजीव भांबोरे बोलत होते.

व्यक्तीच्या मनात, जिद्द,मेहनत, चिकाटी, परिश्रम असेल आणि त्यांना सामाजिक कार्याची जाणीव असेल तर तो व्यक्ती खरोखरच जीवनात यशस्वी ठरतो असे प्रतिपादन केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चुनीलाल लांजेवार तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच लोकमुद्राताई वैरागडे, माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र बिलवणे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज वैरागडे, ग्रामपंचायत सदस्य निलेश काटेखाये उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने भाकरे सर, मंगला बोरकर, मनोज वैरागडे यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल कोरोना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांचा शाळा व्यवस्थापन समिती आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कान्हेट मध्ये शिक्षण घेणाऱ्या ३८  विद्यार्थ्यांना स्वतःच्या पैशातून वह्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार, भाकरे सर, अनेराव मॅडम, फंदे मॅडम, धांडे मॅडम, मरगडे मॅडम शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...