Skip to main content

मास्को ( रशिया)शहरात साहीत्य सम्राट लो. अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा १७ सप्टेबंर ला अणावरण



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अणावरण ....

 मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम. जी. डी. ग्रुप ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद रशियातील पुश्किन विद्यापीठ, मास्को येथे सुरू आहे. आज, मंगळवार दि. १४ रोजी रशियात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे दोन पुतळेदेखील उभारण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ यांनी दिली.

नाशिक: मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम. जी. डी. ग्रुप ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद रशियातील पुश्किन विद्यापीठ, मास्को येथे सुरू आहे.






१४ रोजी रशियात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे दोन पुतळेदेखील उभारण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ यांनी दिली.

या सोहळ्यासाठी देशभरातून ३५० भारतीय रशियातील पुश्किन विद्यापीठात गेले आहेत. नाशिकमधूनही तीस जण यासाठी गेले असून, त्यात साहेबराव खरात, भगवान भोगे, शकुंतला खरात, डॉ. सुरेश कांबळे, सुभाष पवार, अशोक पवार, उत्तम अहिरे, प्रशांत साळवे यांसह विविध क्षेत्रांतील लोक आहेत. या परिषदेत नाशिक येथील लेखक डॉ. सुरेश कांबळे यांच्या मातंग समाजातील समस्यांवर आधारित 'वेध' तसेच साठे यांच्या जीवनचरित्रावर आधारित सुभाष पवार यांच्या 'जागर' या पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी जाणाऱ्या सर्वांना साठे फाउंडेशनचे संस्थापक सुभाष शेजवळ, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब शिरसाठ आदींनी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...