Skip to main content

कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेच्या किनवटअध्यक्षपदी प्रा.राजीव राठोड , सचिवपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार

 


(किनवट )किनवट तालुका कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.राजीव राठोड , सचिवपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार , उपाध्यक्षपदी डॉ .वसंत राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.                                   दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी सरस्वती विद्यामंदिर किनवट येथे तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेची बैठक संपन्न झाला या बैठकीत प्रमुख उपस्थिती म्हणून बळीराम पाटील महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक  विजय खुपसे ,प्रा.अनिल पाटील, प्रा.  रेणुकादास पहुरकर ,मुख्याध्यापक प्रा. घनश्याम राठोड आदींच्या उपस्थितीमध्ये लोकशाही पद्धतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .           अध्यक्ष म्हणून सरस्वती महाविद्यालयाचे प्रा.राजीव राठोड उपाध्यक्ष सरस विद्यालय मांडवी चे डॉ.वसंत राठोड, सचिव बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्रा. पुरुषोत्तम येरडलावार ,कोषाध्यक्ष बापूजी पाटील, सहसचिव मुळे बी. एम. ,महिला प्रतिनिधी डॉ रत्ना कोमावार, सदस्य प्रा.सुरेश कावळे,प्रा. एकनाथ पोले, निमंत्रित सदस्य म्हणून प्रा. मंगनाले एस. बी .आदि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला उच्च विद्या विभूषित विद्यावाचस्पती पदवी प्रदान केलेल्या बळीराम पाटील महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. रत्ना कोमावार ,डॉक्टर  लता पेंडलवाड, सरस विद्यालय मांडवी चे डॉ.वसंत राठोड ,महात्मा फुले विद्यालयाचे डॉ.सोनकांबळे व नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्रा. चंद्रकांत दमकोंडवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला  या कार्यक्रमाला प्रा.ज्ञानेश्वर चाटे, प्रा.अपर्णा आरमालकर, प्रा.राधिका तिरमनवार प्रा. साळुंके, प्रा. मुंडे आदींची उपस्थिती होती याप्रसंगी प्रा.विजय खुपसे ,प्रा.अनिल पाटील, प्रा.  रेणुकादास  पहुरकर ,मुख्याध्यापक प्रा. घनश्याम राठोड आदींनी आपले विचार व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...