Skip to main content

स्वातंत्र्यदिनी रमेश राशलवार यांचा आत्मदहनाचा इशारा

 



किनवट ता. बातमीदार:-

किनवट नगर परषिदे द्वारा बेल्लोरी किनवट येथील पुरग्रस्त मातंग अनुसुचीत जाती समाजाला गत २० वर्षापासून नियोजित वस्तीवाढ राखीव क्षेत्र मौजे किनवट बेल्लोरी येथील भू. क्र १३०/१ क्षेत्रफळ ०.४९ आर जमीन न. प. च्या ताब्यात घेण्यात आली. परंतु पात्र पुरग्रस्त मातंग (अ.जा.)समाजाला वस्तीसाठी प्लाटींग वाटप न करता खोट्या आश्वासने देत वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे राशलवार यांनी असा इशारा दिला आहे की, १५ आगष्टपर्यत ह्या मागणीचा विचार न झाल्यास त्याच दिवशी कुठल्याही प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.


गत २००२ पासुन ते आज पर्यंत हया समाजाला दरवर्षी महापूराचा तडखा बसून अन्न धान्य व घराची नासधूस होऊन जिवण मरण्याची कसरत करावी लागत आहे. गेल्या २० वर्षापासून न.प. प्रशासन संबंधीत पूरग्रस्त मांतग समाजाला २००२ ला आश्वासन दिले होते कि, नियोजित वस्तीवाढ करु प्लाटींग करुन वस्ती स्थलांतरीत करणार असे लेखी आश्वासन दिले असे अनेक आश्वासनाचे लेखी प्रत आजही उपलब्ध आहेत. लोकशाही मार्गाने कित्येकवेळा आमरण उपोषण व आंदोलने केली. प्रत्येक वेळी लोक प्रतिनीधिंनी व न.प प्रशासनाने आश्वासन देत पुरग्रस्त मांतग (अनुसुचीत जाती) समाजाला दिशाभूल केले आहे. सदर प्रकरणात किनवट बेल्लोरी येथील भु क्र १३०/१ क्षेत्रफळ ०.४९ आर जमिन आरक्षीत करण्यात आली सदर जमिनीत दलितवस्ती ऐवजी जनवरांचे व मानसाचे विष्टाराने भरलेला दिसतो मग हा आमच्या (अ.जा.)दलित समाजावर अन्याय नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. करीता हया समाजाला न्याय मिळावा म्हणून दिनांक १५/८/२०२२ पर्यंत हया मागण्य्याची पूरतर्ता करावी अन्यथा नाईलाजास्तव आक्रमक भुमिका घेण्यात येईल. असेही त्यांनी सादर केलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे. सदर प्रकरणात काही मानसिक व शारीरीक नूकसान झाल्य्यास संपूर्ण जबाबदारी न. प. प्रशासनावर राहील असे रमेश राशलवार त्यांनी सादर केलेल्य्या लेखी निवेदनात दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला