Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा रक्षाबंधन स्तुत्य उपक्रम : पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे




करमाळा, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने करमाळा पोलीस ठाणेमधील पोलीस बांधव, पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे, टेंभुर्णी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे, उपनिरीक्षक यांना राखी बांधून भाऊ बहिणीचे पवित्र नाते गुंफले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा करमाळा या संघाने गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी करमाळा पोलीस ठाणेमधील पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्यासह ३५ पोलीस, हवालदार, उपनिरीक्षक यांना राखी बांधली. यावेळी पोलीस निरिक्षक कोकणे यांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करुन अनेक पोलीस बांधव आपल्या ड्युटीमुळे रक्षाबंधनाला बहीणीच्या घरी जाऊ शकत नाहीत अथवा बहिण सुदधा आपल्या भावाकडे येऊ शकत नाही, पत्रकार संघातील महिला पदाधिकारी यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून बहिण भावाचे नाते गुंफले. आपण पोलीस ठाणेकडुन या संघाला निश्चित सहकार्य करु असेही सांगितले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने करमाळा तहसीलदार समीर माने यांनाही राखी बांधली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, सदस्या माधुरी कुंभार यांनी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. 


करमाळा तालुक्यात पोलीस निरीक्षक कोकणे यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

 संघाच्या वतीने पोलीस बांधव व कैदी बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे, सचिव प्रदीप पवार, जेऊर शहराध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, सदस्य प्रमोद खराडे, संभाजी शिंदे, संजय चांदणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...