Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा रक्षाबंधन स्तुत्य उपक्रम : पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे




करमाळा, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने करमाळा पोलीस ठाणेमधील पोलीस बांधव, पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे, टेंभुर्णी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे, उपनिरीक्षक यांना राखी बांधून भाऊ बहिणीचे पवित्र नाते गुंफले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा करमाळा या संघाने गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी करमाळा पोलीस ठाणेमधील पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्यासह ३५ पोलीस, हवालदार, उपनिरीक्षक यांना राखी बांधली. यावेळी पोलीस निरिक्षक कोकणे यांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करुन अनेक पोलीस बांधव आपल्या ड्युटीमुळे रक्षाबंधनाला बहीणीच्या घरी जाऊ शकत नाहीत अथवा बहिण सुदधा आपल्या भावाकडे येऊ शकत नाही, पत्रकार संघातील महिला पदाधिकारी यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून बहिण भावाचे नाते गुंफले. आपण पोलीस ठाणेकडुन या संघाला निश्चित सहकार्य करु असेही सांगितले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने करमाळा तहसीलदार समीर माने यांनाही राखी बांधली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, सदस्या माधुरी कुंभार यांनी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. 


करमाळा तालुक्यात पोलीस निरीक्षक कोकणे यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

 संघाच्या वतीने पोलीस बांधव व कैदी बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे, सचिव प्रदीप पवार, जेऊर शहराध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, सदस्य प्रमोद खराडे, संभाजी शिंदे, संजय चांदणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.