Skip to main content

स्वातंत्र्यदिनी किल्ल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवा अन्यथा उपोषण माजी नगरसेवकाचा निवेदनाद्वारे उपोषनाचा इशारा



माहूर / प्रतिनिधी:


माहूर गडावर असलेल्या किल्ल्यावर भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून राष्ट्रध्वज फडकविला जात होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने किल्ल्याचा दर्शनी भाग जेथे राष्ट्रध्वज फडकविला जात होता त्या जागेची पडझड झाली होती.


शाषणाकडून त्या ठिकाणच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी देवून त्या जागेची दुरुस्ती करून जागा राष्ट्रध्वज फडकविण्या योग्य बनविण्यात आली. ही बाब पुरातत्व विभाग व सा.बा. विभागाने लेखी तहसीलदार कार्यालयात कळविलेली आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी किल्ला व किल्ल्याच्या परिसरातील बऱ्याच वास्तूंची दुरुस्ती करण्यातयेऊन किल्ला पर्यटकांसाठी आकर्षनाचे केंद्रबनला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून माजी नगरसेवकाणे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि इतर संबंधित सर्व विभागाकडे निवेदना द्वारे

किल्ल्याच्यादर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवावा म्हणून मागणी करत आहे परंतु काही ना काही कारण पुढे करून पूर्वीच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविला जात नाही. गेल्या ५ वर्षांपासून प्रत्येक दि. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १७ सप्टेंबर, १ मे रोजी अपणासह इतर सर्व अधिकाऱ्यांना निवेदने देऊन किल्ल्याच्यादर्शनी भागावर पूर्वीच्याठिकाणी राष्ट्रध्वज फडकवावा अशी विनंतीकरीत आहे परंतु कुणीही अर्ज गांभीर्याने घेतला नाही. माजी नगरसेवक इलियास बावाणी यांनी वेळोवेळी दिलेल्या अर्जाला केराची टोपली दाखविली गेली होती. आता जिल्ह्यात हर घर झेंडा अभियान मोहीम, (राष्ट्रीय कार्यक्रम) घोषित केला आहे ही सर्वात मोठ्या अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मला आता खात्री वाटत आहे की आपण या कामाला प्राथमिकता देऊन किल्ल्याच्यादर्शनी भागावर पुरवीप्रमाणे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाची गरिमा कायम ठेवसालअसेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिलेल्या अर्जाचा विचार करून दि. १३ ऑगस्ट पर्यंत लेखी न कळविल्यास १४ आगस्ट रोजी माहुरच्या तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा जिल्हाधिकारी, तहसीलदार, सा.बा. उप विभागीय अभियंता, मुख्याधिकारी माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय

तसेच सर्व संबंधिताकडे पत्रव्यवहार करत असून झाडे वाढली झेंड्याचा खांब नादुरुस्त आहे थांबायला जागाजागा नाही अशी कारणे दाखवून टाळाटाळ केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.