Skip to main content

स्वातंत्र्यदिनी किल्ल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवा अन्यथा उपोषण माजी नगरसेवकाचा निवेदनाद्वारे उपोषनाचा इशारा



माहूर / प्रतिनिधी:


माहूर गडावर असलेल्या किल्ल्यावर भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून राष्ट्रध्वज फडकविला जात होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने किल्ल्याचा दर्शनी भाग जेथे राष्ट्रध्वज फडकविला जात होता त्या जागेची पडझड झाली होती.


शाषणाकडून त्या ठिकाणच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी देवून त्या जागेची दुरुस्ती करून जागा राष्ट्रध्वज फडकविण्या योग्य बनविण्यात आली. ही बाब पुरातत्व विभाग व सा.बा. विभागाने लेखी तहसीलदार कार्यालयात कळविलेली आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी किल्ला व किल्ल्याच्या परिसरातील बऱ्याच वास्तूंची दुरुस्ती करण्यातयेऊन किल्ला पर्यटकांसाठी आकर्षनाचे केंद्रबनला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून माजी नगरसेवकाणे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि इतर संबंधित सर्व विभागाकडे निवेदना द्वारे

किल्ल्याच्यादर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवावा म्हणून मागणी करत आहे परंतु काही ना काही कारण पुढे करून पूर्वीच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविला जात नाही. गेल्या ५ वर्षांपासून प्रत्येक दि. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १७ सप्टेंबर, १ मे रोजी अपणासह इतर सर्व अधिकाऱ्यांना निवेदने देऊन किल्ल्याच्यादर्शनी भागावर पूर्वीच्याठिकाणी राष्ट्रध्वज फडकवावा अशी विनंतीकरीत आहे परंतु कुणीही अर्ज गांभीर्याने घेतला नाही. माजी नगरसेवक इलियास बावाणी यांनी वेळोवेळी दिलेल्या अर्जाला केराची टोपली दाखविली गेली होती. आता जिल्ह्यात हर घर झेंडा अभियान मोहीम, (राष्ट्रीय कार्यक्रम) घोषित केला आहे ही सर्वात मोठ्या अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मला आता खात्री वाटत आहे की आपण या कामाला प्राथमिकता देऊन किल्ल्याच्यादर्शनी भागावर पुरवीप्रमाणे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाची गरिमा कायम ठेवसालअसेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिलेल्या अर्जाचा विचार करून दि. १३ ऑगस्ट पर्यंत लेखी न कळविल्यास १४ आगस्ट रोजी माहुरच्या तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा जिल्हाधिकारी, तहसीलदार, सा.बा. उप विभागीय अभियंता, मुख्याधिकारी माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय

तसेच सर्व संबंधिताकडे पत्रव्यवहार करत असून झाडे वाढली झेंड्याचा खांब नादुरुस्त आहे थांबायला जागाजागा नाही अशी कारणे दाखवून टाळाटाळ केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...