Skip to main content

गोदावरी अर्बनच्या “हर ब्रॅच तिरंगा” उपक्रम प्रतिसाद व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर; यांची माहिती ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 


नांदेड, दि. १३ (प्रतिनिधी)-  या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" अभियानात प्रत्येक नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून गोदावरी अर्बन परिवाराने देखील "हर घर तिरंगा" अभियानांतर्गतन गोदावरी अर्बनच्या पाच राज्यातील ९१ ब्रँचमध्ये हर ब्रँच तिंरंगा हा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविल्याची गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी माहिती दिली.

                 गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच राज्यातील गोदावरीच्या ९१ शाखांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, तरोडा नाका येथील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य या मुख्यालयाचे कार्यालयात शनिवारी (ता.१३) हा उपक्रम मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी सांगितले आहे.  पुढे ते म्हणाले की, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात व कर्नाटक या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये नियमितपणे सांस्कृतीक व समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येत आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे. याच धर्तीवर गोदावरी अर्बनच्या वतीने देखील हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यासोबतच राष्ट्रीय ध्वजाचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊन हा "हर ब्रँच तिरंगा" उपक्रम मोठ्या उत्साहत सांजरा करण्यात आला. गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बन सहकारी मल्टीस्टेट को. आपरेटिव्ह सहकारी पतसंस्थेच्या वतीने गोदावरी अर्बनच्या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये हर ब्रँत तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला. यास चांगलाच प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी गोदावरी अर्बन मुख्यालय मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे,  मुख्यालयाचे मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवी इंगळे, विपणन व्यवस्थापक महेश केंद्रे, शाखा व्यवस्थापक सर्वश्री भारत राठोड , विनोद आदे , धनंजय क्षीरसागर, विजय मोडक , अनिरुद्ध पाथ्रडकर, राहूल कोल्हे ,  शिवराज वल्लेवाड , पंकज ईंदूरकर , गणेश जाधव, अशोक चोपडे, अरविंद महाजन  मुख्य शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे पाटील,  चिखलवाडी  शाखेचे  गुरुतेज सिंग, गोपाल जाधव लेखा विभाग प्रशांत कदम , देविदास पोळकर , आयटी विभाग पवन यादव यांच्यासह मराठवाडा आणि विदर्भातील गोदावरी अर्बनचे शाखाप्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला