Skip to main content

नाबार्डच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानात गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्थेचे योगदान मोलाचे- मा.किर्तिकिरण एच. पुजार( प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी ए.आ.वि.प्र. किनवट)

 


किनवट ता. प्रतिनिधी:-

भारताला स्वातत्र्यं मिळुन ७५ वर्ष पुर्ण होत आहे यंदाचे वर्ष हे अमृत महोत्सवाच आहे मन की बात कार्यक्रमातुन 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या अभियानाला भारतभरातुन  प्रतिसाद मिळत आहे याचाच एक भाग म्हणुन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा.किर्तीकिरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्था किनवटच्या महिला बचत गटाच्या महिलांनी २०००राष्ट्रध्वज शिवल्याबद्दल मा.किर्तीकिरण एच. पुजार सहायक जिल्हाधिकारी यांनी बचत गट महीलांचे कौतुक केले. 

 हर घर तिरंगा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे त्यांनी सांगितले.


तसेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डयांच्या ४१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी रुपेशजी दलाल यांनी मार्गदर्शन केले व नाबार्डची कारकीर्द सांगितली बचत गटानां कर्ज वाटप केले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहलक्ष्मी महीला ग्रामविकास संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी केले. सरस्वती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनील व्यवहारे यांनी किनवट या आदिवासी दुर्गम भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून  लघुउद्योग व विविध गृह उद्योगातूनआपल्या वस्तू व खाद्यपदार्थह्या विदेशापर्यंत जाऊन त्यांची मागणी विदेशातून सुद्धा व्हावी असा मानस बोलून दाखविला तर पंढरीनाथ ठाकरे यांनी महिला बचत गट यांनी आर्थिक नियोजन कसे करावे बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा उपयोग कशाप्रकारे करावा याचे महत्त्व सांगितले .

या कार्यक्रमात राधा बोलेनवार यांचा व ज्या ज्या महिलांनी झेंडे शिवले त्यांचा सत्कार करण्यात आला  कार्यकमाचे सुत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले तर आभार आत्मानंद सत्यवंश यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा गिरे (सरपंच मदनापुर), राधा बोलेनवार, रुचीता फुलझेले ,  आदींनी सहकार्य केले.


ठळक मुद्दे:

▪️बचत गटाच्या महीलांनी स्वत:२००० झेंडे शिवले

▪️सहायक जिल्हाधिकारी/प्रकल्पाधिकारी यांना केले सुपुर्द

▪️बचत गटाच्या महीलांनी नोंदवला सक्रीय सहभाग

▪️या दरम्यान महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे मुख्य शाखा अधिकारी रुपेश दलाल यांच्या उपस्थितीत महीला बचत गटांना JLG/SHG कर्ज वितरण करण्यात आले.

▪️ एम जी बी शाखा अधिकारी रुपेश दलाल, सरस्वती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनिल व्यवहारे, बीसी पंढरीनाथ ठाकरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.