Skip to main content

-मैत्री...मानवी संवेदनांचं नंदनवन मिता नानवटकर यांचा मैत्रीच महत्व सांगणारा लेख नक्की वाचुया




शीर्षक-मैत्री...मानवी संवेदनांचं नंदनवन मैत्री दोन जीवाचं एक अनोखंच नातं...भावभावनांनी,जाणिवांनी,विचारांनी गजबजलेलं सुंदर असं गाव.वय,लिंग,देश,भाषा या सर्व मर्यादेपलीकडे संवेदनांनी सजलेलं,सामंजस्याने बहरलेलं,शब्दांच्या एका चौकटीत पूर्णपणे व्यक्त न होणारं हे नातं..... एका अद्भुत अनुभूतीने जेंव्हा हेच नातं तनामनात अलवार स्पर्शून जातं तेव्हा अंतर्मनी उसळणारी ती जाणीव खरंच विलोभनीय असते. दोन मनांचे प्रतिबिंब डोळ्यांत स्पष्ट पाहता येईल... हृदयाच्या सुप्त जाणीवा अबोल ओठांतून शब्दांविनाही ऐकू येईल.. अंतर्बाह्य उमळणारा स्पर्श सहज अनुभवता येईल... इतकी जवळीकता आणि समर्पकता या मर्मबंधनात सहज जाणवते.. थरथरणाऱ्या बोटांतून... आंतरिक वेदना ओळखल्या की खोट्या हास्यामागे दडलेला.. पापणकाठी गोठलेला आसवांचा बर्फ क्षणातच वितळून गालावर ओघळतो आणि हृदयनभी उठलेलं वादळ शांत होवून भावनांना पायवाट लाभते...आनंद 'माझा' उरत नाही 'आपला' होतो.एकमेकांच्या सहवासात अंतरातला 'मी' सहजगत्या व्यक्त होतो.का.. कसे...ही औपचारीकता गौण ठरते.जे मनात तेच ओठांवर निर्भयपणे येवून अभिव्यक्तीचा दिलखुलास आनंद लुटला जातो.कधीकधी होणारी विचारांची जटील गुंतागुंतही आपुलकीच्या संवादातून अलगदपणे सुटते आणि मोठमोठी वादळंही पेलण्याचा एक खंबीर विश्वास मिळत जातो.छोट्या-छोट्या गोष्टींतही एकमेकांच्या सहवासात साजरा होणारा हर्षोत्सव हा चिरकाल स्मृती कोंदणात टिकणारा असतो. स्त्री-पुरुष म्हणून असणारी संकुचित दृष्टी येथे नकळतच नाहीशी होते.उरते ती फक्त साहजिकच वाटणारी काळजी आणि समवैचारिकतेची अनामिक ओढ.... अस्तित्वाची कळी खुलवणारी धुंद निशा तर कधी नैराश्याची मरगळ समुळ झटकणारी प्रफुल्लित उषा..हक्काने रागवणं, हवं ते हवं तेंव्हा मागणं,चुकलंच काही तर हळुवार सावरणं,प्रशंसेची तितकीच भरभरून बरसात करणं,नाजुक वेळी आश्वासक शब्दांची चादर पांघरणं..... अजून बरंच काही असतं जे सांगायला शब्दच नाही सापडणार. कुठली कमीटमेंट नाही,वचनांची वर्दळ नाही, भविष्याचे वेध नाही,स्वप्नांची आरास नाही,मागण्यांची किटकिट नाही अन् अपेक्षांची सावलीही नाही.असेल तो फक्त परस्परांवरचा विश्वास.. या नात्याचा पाया... भावनांची इमारत कण्खरपणे सांभाळणारा.... आयुष्याच्या एका वळणावर कुणी सोबत असेल नसेलही कदाचित...पण तो सोबतीचा आभासही खूप काही देवून जाईल ....'मी आहे ना' हे शब्दच पुरेसे असतील पुन्हा नव्याने उठून जीवनाची लढाई लढायला...... खचलेल्या मनाला सावरायला.....कानी पडत राहतील....धीर देणारे प्रत्येक शब्द... स्वतःला झोकून उंच झेपावण्यास प्रेरीत करणारा हात....... परस्परांच्या मनात आठवांचं चांदणं सदैव पडत राहील....असंच....आणि भिजत राहील जग या नात्यातील अलौकिक धुंद सरीत.......
 


मीता अशोक नानवटकर मु.आजणी पो.खानगाव ता.सावनेर जि.नागपूर पि.को.441107. मो.नं 9823219083.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला