Skip to main content

-मैत्री...मानवी संवेदनांचं नंदनवन मिता नानवटकर यांचा मैत्रीच महत्व सांगणारा लेख नक्की वाचुया




शीर्षक-मैत्री...मानवी संवेदनांचं नंदनवन मैत्री दोन जीवाचं एक अनोखंच नातं...भावभावनांनी,जाणिवांनी,विचारांनी गजबजलेलं सुंदर असं गाव.वय,लिंग,देश,भाषा या सर्व मर्यादेपलीकडे संवेदनांनी सजलेलं,सामंजस्याने बहरलेलं,शब्दांच्या एका चौकटीत पूर्णपणे व्यक्त न होणारं हे नातं..... एका अद्भुत अनुभूतीने जेंव्हा हेच नातं तनामनात अलवार स्पर्शून जातं तेव्हा अंतर्मनी उसळणारी ती जाणीव खरंच विलोभनीय असते. दोन मनांचे प्रतिबिंब डोळ्यांत स्पष्ट पाहता येईल... हृदयाच्या सुप्त जाणीवा अबोल ओठांतून शब्दांविनाही ऐकू येईल.. अंतर्बाह्य उमळणारा स्पर्श सहज अनुभवता येईल... इतकी जवळीकता आणि समर्पकता या मर्मबंधनात सहज जाणवते.. थरथरणाऱ्या बोटांतून... आंतरिक वेदना ओळखल्या की खोट्या हास्यामागे दडलेला.. पापणकाठी गोठलेला आसवांचा बर्फ क्षणातच वितळून गालावर ओघळतो आणि हृदयनभी उठलेलं वादळ शांत होवून भावनांना पायवाट लाभते...आनंद 'माझा' उरत नाही 'आपला' होतो.एकमेकांच्या सहवासात अंतरातला 'मी' सहजगत्या व्यक्त होतो.का.. कसे...ही औपचारीकता गौण ठरते.जे मनात तेच ओठांवर निर्भयपणे येवून अभिव्यक्तीचा दिलखुलास आनंद लुटला जातो.कधीकधी होणारी विचारांची जटील गुंतागुंतही आपुलकीच्या संवादातून अलगदपणे सुटते आणि मोठमोठी वादळंही पेलण्याचा एक खंबीर विश्वास मिळत जातो.छोट्या-छोट्या गोष्टींतही एकमेकांच्या सहवासात साजरा होणारा हर्षोत्सव हा चिरकाल स्मृती कोंदणात टिकणारा असतो. स्त्री-पुरुष म्हणून असणारी संकुचित दृष्टी येथे नकळतच नाहीशी होते.उरते ती फक्त साहजिकच वाटणारी काळजी आणि समवैचारिकतेची अनामिक ओढ.... अस्तित्वाची कळी खुलवणारी धुंद निशा तर कधी नैराश्याची मरगळ समुळ झटकणारी प्रफुल्लित उषा..हक्काने रागवणं, हवं ते हवं तेंव्हा मागणं,चुकलंच काही तर हळुवार सावरणं,प्रशंसेची तितकीच भरभरून बरसात करणं,नाजुक वेळी आश्वासक शब्दांची चादर पांघरणं..... अजून बरंच काही असतं जे सांगायला शब्दच नाही सापडणार. कुठली कमीटमेंट नाही,वचनांची वर्दळ नाही, भविष्याचे वेध नाही,स्वप्नांची आरास नाही,मागण्यांची किटकिट नाही अन् अपेक्षांची सावलीही नाही.असेल तो फक्त परस्परांवरचा विश्वास.. या नात्याचा पाया... भावनांची इमारत कण्खरपणे सांभाळणारा.... आयुष्याच्या एका वळणावर कुणी सोबत असेल नसेलही कदाचित...पण तो सोबतीचा आभासही खूप काही देवून जाईल ....'मी आहे ना' हे शब्दच पुरेसे असतील पुन्हा नव्याने उठून जीवनाची लढाई लढायला...... खचलेल्या मनाला सावरायला.....कानी पडत राहतील....धीर देणारे प्रत्येक शब्द... स्वतःला झोकून उंच झेपावण्यास प्रेरीत करणारा हात....... परस्परांच्या मनात आठवांचं चांदणं सदैव पडत राहील....असंच....आणि भिजत राहील जग या नात्यातील अलौकिक धुंद सरीत.......
 


मीता अशोक नानवटकर मु.आजणी पो.खानगाव ता.सावनेर जि.नागपूर पि.को.441107. मो.नं 9823219083.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...