Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर



सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. 

यावेळी माढा तालुका, करमाळा तालुका, माळशिरस तालुका कार्यकारिणी व सोलापूर जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या. सदर कार्यक्रम टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमाच्या हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रेस संपादक व पत्रकार  सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे, महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीमती विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव श्रीमती प्रमिला जाधव, तसेच माळशिरस तालुकाध्यक्षपदी शशिकांत कडबाने, उपाध्यक्षपदी किरण शेंडगे, माढा तालुका अध्यक्षपदी कुंदन वजाळे, तालुका उपाध्यक्ष सिद्धनाथ सावंत, करमाळा तालुका अध्यक्षपदी अगंद भांडवलकर, उपाध्यक्षपदी धनंजय पाटील, तालुका सचिवपदी अक्षय वरकड, तालुका सचिव हर्षवर्धन गाडे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करून पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य सुरू असून या संघटनेत सहभागी झालेल्या पत्रकारांची पूर्णपणे काळजी घेतली जाते. पत्रकार व त्यांचे कुटुंबीय यांचे आरोग्य, शिक्षण व न्याय हक्कासाठी  संघटना कार्य करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी राजकुमार डांगे यांची विशेष उपस्थित होती. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृद्धाश्रमातील सदस्यांना फळे वाटप करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...