Skip to main content

करंजी येथे विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी.

 


उमरखेड:  तालुक्यातील करंजी  येथे दि.21 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध  महासभा  शाखा  करंजी व जयंती  उत्सव समिती  करंजीच्या वतीने  नुकतेच  विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.

पंचशील  ध्वजारोहन  सकाळी मा. माधवराव कलाने  पाटील करंजी सोसायटीचे  अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.

 कार्यक्रमाचे  उदघाटन मा. राहुल कऱ्हाळे (प्रकल्प अधिकारी बार्टी यवतमाळ )यांचे हस्ते केले.


कार्यक्रमाचे  अध्यक्ष मा. विजयराव  खडसे ( माजी आमदार उमरखेड )तर कविसंमेलनाचे  अध्यक्ष मा. सुधाकर लोमटे (सुप्रसिद्ध साहित्यिक उमरखेड )यांनी पद भूषविले.

प्रमुख पाहूणे =मा. प्राचार्य मोहनराव मोरे (माजी नगराध्यक्ष  पूर्णा.),मा. किशोर  भवरे  दलितमित्र (महापौर  प्रतिनिधी  नांदेड ), धम्मदीप  काळबांडे(अध्यक्ष भा. बौद्ध महा उमरखेड तालुका )उत्तम कानिंदे (स्तंभलेखक  किनवट ),प्रा. मुनेश्वर मॅडम,रंजना वाघमारे सामाजिक कार्यकर्त्या  बिटरगांव,शुद्धोधन घुगरे  (सरपंच  करंजी ) निवृत्ती काळबांडे, अनिल कांबळे ( सावळेश्वर,पोलीस पाटील )संगीताताई कलाने  (पोलीस पाटील करंजी ) अभय  कांबळे बिटरगाव,युवराज कलाने पाटील  (इंजि.)हे उपस्थित होते.


आंबेडकऱी कविसंमेलनात सहभागी  कवी


किनवटचे साहित्यिक कवी रमेश मुनेश्वर सर, महेंद्र  नरवाडे  सर, रुपेश  मुनेश्वर सर, प्रा. गजानन  सोनोने सर.

उमरखेड व परिसरातील कवी =प्रा. शा. द. रोकडे सर, सहदेव शिंगणकर, भारत  सूर्यवंशी, सुभाष  शिंगणकर, मारोती काळबांडे, नारायण पाटील, गरुड, दगडू  घुगरे, सुमेध  घुगरे आदी कविंनी बहारदार  रचना सादर  करून अनेकांची  मने जिंकली.


मा. विजयराव  खडसे मा. आमदार,यांनी महापुरुषांच्या जयंती सर्वत्र मनवल्या गेल्या पाहिजे असे प्रतिपादन केले व किशोर भवरे,यांनी देश विदेशातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे अनुभव व्यक्त केले तसेच  राहुल कऱ्हाळे  यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान व समाज कल्याण व बार्टीच्या स्टँड अप इंडिया मार्जिन मनी, स्वाधार योजना, निवासी शाळा, वसतिगृह, क दादासाहेब गायकवाड सबलीकरण डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना MPSC UPSC IBPS पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण व विविध योजनाची माहिती दिली. आणि आपल्या विचारातून जनतेवर  प्रकाश  टाकला.


संमोहन  कार्यक्रम


सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ  मा. नवनाथ  गायकवाड पुणे यांचा अंधश्रद्धा निर्मूलन आणि

समाजप्रबोधन  कार्यक्रम झाला.


सांस्कृतिक प्रबोधन


महाराष्ट्राचे  ख्यातनाम कवी  गायक  विजय पवार  व गायिका  संगीता  पवार (गायकवाड )आणि त्यांचा संच  मुदखेड  यांचा गायनाचा  वैचारिक सामना झाला.

परिसरातील  लोकं बहुसंख्येने   उपस्थित होते.


राजेश घुगरे अध्यक्ष भा. बौद्ध. महासभा  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे सर, बापुराव वाढवे तर

आभार  कविसंमेलनाचे  निमंत्रक -सुमेध  घुगरे , व दिशांत  घुगरे  यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  आयोजक भारतीय बौद्ध  महासभा  शाखा  करंजी व जयंती  उत्सव समितीच्या 

कार्यकर्त्यांनी  व तसेच  दत्ता वि. घुगरे, प्रकाश  सु. घुगरे  जयघोष घुगरे,कोंडबा गो.घुगरे, संभा का. घुगरे, जांबुवंतराव  घुगरे,गौतम घुगरे मिस्त्री,राहुल गायकवाड, राहुल घुगरे  अरुण घुगरे , सुनिल घुगरे, दुर्गेश काळबांडे,कोंडबा राऊत, सतिश  घुगरे, संदीप  गाडेकर, अमोल घुगरे, काशिनाथ  घुगरे  आणि  महिला  मंडळींनी सुद्धा यांनी अथक  परिश्रम  घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला