Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड किनवट दौऱ्यावर

    


किनवट ता.प्रतिनिधी:   प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड   अध्यक्षतेखाली व मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या उपस्थितीत किनवट तालुका कार्यकारणी ची महत्त्वपुर्ण  बैठक संपन्न झाली. 

  आज दिनांक 24 एप्रिल रोजी ठीक 2 वाजता "आज कि न्यूज" कार्यालयात आयोजित बैठकीत किनवट तालुका कार्यकारणीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली.

    पत्रकारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा यशस्वीपणे प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेच्या मार्फत होत असून आपल्या काही समस्या असतील तर त्या जिल्हा कार्यकारणी कडे किंवा संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सर यांच्याकडे मांडाव्यात त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असेही आश्वासन जिल्हाध्यक्ष मा.संजीव कुमार गायकवाड यांनी या बैठकीदरम्यान बोलताना दिले. 

  तसेच किनवट टीमच्या  वतीने विविध विधायक कार्यक्रम राबवून समाजसेवा कार्यात अग्रेसर असल्याबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त करून पुढील कार्यास सर्वांना शुभेच्छा दिल्या.

       याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांचा किनवट प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ च्या वतीने  शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

        याप्रसंगी तालुका अध्यक्ष आशिष शेळके तालुका सचिव नसिर तगाले, कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील, ता. उपाध्यक्ष शेख अतिफ, , सहसचिव प्रणय कोवे,ता.सहकोषाध्यक्ष मारोती देवकाते,तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश परचाके, चंद्रकांत कागणे, प्रा.जोगदंड सर,उद्धवराव रामतीर्थकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला