Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने PI श्री तायडे यांना निरोप तर PI श्री काइंगडे यांचे स्वागत




पाली,रायगड प्रतिनिधि : 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सुधागड पालीचे पोलीस निरीक्षक श्री तायडे यांना निरोप देण्यात आला तर नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काइंगडे यांचे स्वागत यांचे स्वागत करण्यात आले.

 दिनांक २३ डिसेंबर,२०२१ रोजी सुधागड पाली तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री तायडे यांचा निरोप समारंभ तथा नवनार्चित पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काइंगडे यांच स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी, सुधागड पालीचे तहसीलदार श्री रायन्नावर तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील राजकीय नेते व पत्रकार उपस्थित होते याप्रसंगी पोलीस ठाणे पाली यांनी प्रेस संपादक पत्रकार संघाचे सुधागड तालुका अध्यक्ष राजू शेख यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रेस संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र सुधागड तालुका अध्यक्ष म्हणून राजू शेख यांनी त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन या समारंभ मध्ये उपस्थित राहून श्री तायडे यांना निरोप देऊन नवनार्चित पोलीस निरीक्षक श्री काइंगडे यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी यांनी मनोगत व्यक्त करून संघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

निरोप समारंभा प्रसंगी श्री तायडे यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तर नवीनच रुजू झालेले पोलीस निरक्षक श्री काइंगडे यांचे प्रेस संपादक व पत्रकार संघाचे सुधागड तालुका अध्यक्ष राजू शेख व इतर पत्रकार बंधूनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते